देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून जनतेला मोठमोठी आश्वासने दिले जातात. यामध्ये राजकीय पक्षांकडून अनेक गोष्टी मोफत देण्याच्या घोषणा केल्या जातात. हा प्रकार सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येही दिसून येतो. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला एक सल्ला दिला आहे.

“राजकीय पक्षांच्या मोफत सुविधा देण्याच्या आश्वासनांवर श्वेतपत्रिका आणावी”, असा सल्ला माजी आरबीआय गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी दिला आहे. सध्या विविध राजकीय पक्षांकडून लोकांना अनेक मोफत योजनांचा लाभ दिला जात आहे. तसेच याबाबत आश्वासनेही दिले जात आहेत. मात्र, याबाबत लोकांमध्ये जागरुकता करणे गरजेचे आहे. याबरोबरच या मुद्यांवर सरकारने ‘श्वेतपत्रिका’ आणली पाहिजे, तसेच या संदर्भात राजकीय पक्षांवर कशा पद्धतीने आवर घालता येईल? यावर सखोल चर्चा व्हायला हवी, असे मत डी सुब्बाराव यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिले आहे.

national human rights commission orders police inquiry into detaining rti activist
माहिती अधिकार कार्यकर्त्याला केले नजरकैद; पोलिसांच्या चौकशीचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आदेश
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
School girl pune, School girl,
पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचालकाकडून शाळकरी मुलीला अश्लील संदेश, मनसे कार्यकर्त्यांकडून चोप
bharat bandh on august 21
Bharat Bandh : २१ ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’ची हाक; जाणून घ्या ‘बंद’मागचं नेमकं कारण?
extradition with India for Sheikh Hasina
शेख हसीना यांचे भारतातून बांगलादेशात प्रत्यार्पण होणार? भारताच्या अडचणी वाढणार? प्रत्यार्पण म्हणजे काय?
Who is Neelam Gorhe
Neelam Gorhe : विधान परिषदेच्या आमदार ते कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळालेल्या शिवसेनेच्या पहिल्या महिला नेत्या; राजकीय पार्श्वभूमी नसतानाही नीलम गोऱ्हेंनी कशी साधली किमया?
sudhir mungantiwar reacts on supriya sules statement about democracy
सुप्रिया सुळेंना मुनगंटीवारांचा टोला, म्हणाले “माविआ सरकार होतं तेव्हा..”
Kolkata doctor rape murder case
Mamata Banerjee : कोलकाता बलात्कार प्रकरणी ममता बॅनर्जींचा पोलिसांना अल्टीमेटम; म्हणाल्या, “रविवारपर्यंत प्रकरण निकाली काढा, अन्यथा…”

“मोफत मिळणाऱ्या फायद्यांबाबत सर्वसामान्यांना अधिक जागरुक केले पाहिजे. याविषयी लोकांमध्ये प्रबोधन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. माझ्या मते हा राजकीय मुद्दा आहे. त्यावर राजकीय एकमत व्हायला हवे. त्यामुळे त्याचे नेतृत्व केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी करावे. त्यांनी श्वेतपत्रिका जारी करुन त्यावर एकमत घडवण्याचा प्रयत्न करावा, असे आपल्याला वाटते”, असे डी सुब्बाराव म्हणाले.

हेही वाचा : “DD चं आता भगवीकरण झालंय”, लोगोचा रंग बदलल्यावरून माजी CEO चा हल्लाबोल; म्हणाले, “प्रसार नव्हे, प्रचार भारती!”

डी सुब्बाराव पुढे म्हणाले, “राज्ये आणि केंद्र सरकारने आर्थिक स्थिती राखली पाहिजे. एका अभ्यासानुसार भारताला विकसित राष्ट्र बनण्यासाठी २०४७ पर्यंत ७.६ टक्के दराने सतत विकास करण्याची आवश्यकता आहे. मात्र, हवामानात होणारे बदल, जागतिकीकरण अशा काही आव्हानांमुळे आपण हे करू शकतो का? हा मोठा प्रश्न आहे”, असे डी सुब्बाराव म्हणाले.

श्वेतपत्रिका म्हणजे काय?

श्वेतपत्रिकेमध्ये एखाद्या विशिष्ट समस्येविषयी सविस्तर माहिती सादर केली जाते. श्वेतपत्रिका म्हणजे एखाद्या विषयाबाबत केंद्र किंवा राज्य सरकारने दिलेली अधिकृत माहिती होय. एखाद्या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतली, काय कृती केली त्याची संपूर्ण माहिती या श्वेतपत्रिकेत असते. त्यामधून शासनाच्या भूमिकेचा आणि कृतीचा अंदाज येतो. श्वेतपत्रिकेत नमूद असलेली माहिती गोपनीय स्वरुपाची नसते.