पीटीआय, मुझफ्फरानगर

उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रा मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट्स, खाद्यापदार्थांच्या मालकांना त्यांची नावे फलकावर प्रदर्शित करण्याचा आदेश दिल्यामुळे हिंदू-मुस्लीम हॉटेल मालकांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. उत्पन्न घटण्याची भीती असल्याने हॉटेल मालकांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. लहान फळ विक्रेत्यांच्या कमाईवरही या निर्णयाचा परिणाम होण्याची भीती आहे.

Chief Justice Dhananjay Chandrachud asserted that a three tier scheme would soon be in place for the disposal of cases
खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी लवकरच त्रिस्तरीय योजना; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
mhada Reduce Consent Requirement of building owner for Group Redevelopment
समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
supreme court on governor marathi news
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत
cbi investigation into financial irregularities in r g kar medical college
आर्थिक अनियमिततेप्रकरणी ‘सीबीआय’चा तपास; कोलकाता हत्या प्रकरणात आरोपींच्या मालमत्तांचीही झडती
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक
Maratha Reservation, reservation,
आंदोलनांना बळी पडून आरक्षण दिले, तर राज्यातही बांगलादेशसारखी परिस्थिती, आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा दावा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही त्यांच्या राज्यात अशाच प्रकारच्या सूचना दिल्याचे सांगितले. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या या निर्णयाविरोधात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, तसेच असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा >>>बांगलादेशात आरक्षणाला कात्री!; हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मुझफ्फरनगरच्या खतौली भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर गेल्या सात वर्षांपासून ब्रिजेश पाल हा रोजंदारीवर काम करतो. श्रावणातील दोन महिन्यांत त्याच्या मुस्लिम मालकाला ग्राहकांची मुख्यत: कावड यात्रेकरूंची गर्दीचे नियोजन करण्यास तो मदत करतो. परंतु यंदाच्या वर्षी त्याचे मालक मोहम्मद अर्सलान यांनी त्याला इतर ठिकाणी काम शोधण्यास सांगितले आहे. अर्सलान म्हणाले की, माझे अर्ध्याहून अधिक कर्मचारी हिंदू आहेत. मुस्लीम नाव पाहून कावड यात्रेकरू माझ्या ढाब्यावर येऊन जेवणार नाहीत, याची मला भीती वाटते. ॉसरकारच्या या आदेशाचा परिणाम केवळ मुस्लीम मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवरच होणार नाही, तर हिंदू मालकांच्या भोजनालयात काम करणाऱ्या मुस्लीम कर्मचाऱ्यांवरही याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयाविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले.

आदेश मागे घ्या : जयंत चौधरी

तीर्थयात्रा कोणत्याही एका धर्माची किंवा जातीची नाही, असे सांगून कावड मार्गावरील भोजनालयावर त्यांच्या मालकांची नावे लिहिण्यासंबंधीचा आदेश मागे घेण्याची मागणी भाजपचे सहयोगी राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी रविवारी उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे. फारसा विचार न करता हा आदेश काढण्यात आला आहे. सरकारने हा आदेश लागू करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.