नदी जोड प्रकल्प राबवण्यापासून आपण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आपण रोखले व आताचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा नदी जोड प्रकल्प ही एक धोकादायक योजना आहे, असे खासदार मनेका गांधी यांनी बुधवारी सांगितले.
वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने नदी जोड प्रकल्प राबवण्याचे ठरवले होते पण आपण त्यांना रोखले, असे त्या म्हणाल्या.
गोमती नदी शारदा नदीला जोडण्याबाबत विचारले असता ओनला मतदारसंघाच्या खासदार असलेल्या मनेका म्हणाल्या, की आपण अटलजींना त्या नदी जोड योजनेपासून परावृत्त केले, या योजना म्हणजे बकवास आहे. जगात या योजनेइतकी वाईट योजना नाही, असा दावा मनेका यांनी केला.
 प्रत्येक नदीला स्वत:ची परिसंस्था असते. मासे वेगळे असतात, पाण्याचा पीएच वेगळा असतो, जर एक नदी दुसऱ्याला जोडली, तर दोन्ही नद्यांतील मासे व अन्य प्राणी मरतील; त्यामुळे नदीजोड प्रकल्पाबाबतचे गैरसमज दूर व्हायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कालवे बांधता येतील, ते स्वच्छ करता येतील पण गंगा व गोमती यांना जोडले तर ते फार भयानक असेल. या प्रकल्पासाठी १०-१५ लाख एकर जमीन लागेल व ती वाया जाईल, एवढी जमीन कोण देणार आहे असा सवाल करून त्या म्हणाल्या, की मोदी यांनी त्यांच्या सभांमध्ये नद्या जोडून देशातील दुष्काळ दूर करण्याचे मनसुबे बोलून दाखवले पण अशी योजना प्रत्यक्षात आणणे घातक आहे.

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Bangladeshis and Rohingya muslims latest news
मालेगाव : उशिराने जन्म, मृत्यू प्रमाणपत्रास स्थगिती; घुसखोरीच्या आरोपांनंतर सरकारचा निर्णय
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
Story img Loader