रोहिंग्या निर्वासितांमुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था, पर्यावरण, सुरक्षा तसेच सामाजिक-राजकीय स्थैर्यतेवर गंभीर परिणाम होत आहे, असे प्रतिपादन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी केले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७७ व्या अधिवेशनात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांनी रोहिंग्या निर्वासितांच्या प्रश्नावर परिणामकारक भूमिका पार पाडावी, असे आवाहन केले.

हेही वाचा >>> विश्लेषण : रोहिंग्या : निर्वासित की बेकायदा स्थलांतरित?

Pervez Musharraf land acqasition
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मुशर्रफ यांच्या भारतातील वडिलोपार्जित जमिनीचा लिलाव; शत्रू संपत्ती कायदा काय आहे?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
How India response to Vladimir Putin in the Ukraine war
युक्रेन युद्धात पुतिन यांना हवी भारताची मध्यस्थी? भारताकडून प्रतिसादाची शक्यता किती?
Prime Minister Narendra Modi assertion of support for developmental policy in Brunei
विकासात्मक धोरणाला पाठिंबा; ब्रुनेई येथील भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Alternative for Germany - AfD germany
विश्लेषण : जर्मनीत अतिउजव्या पक्षाच्या निवडणूक मुसंडीमुळे खळबळ… नाझीवाद पुन्हा प्रबळ होतोय का?
Loksatta anvyarth Discussion between Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden on Bangladesh issue
अन्वयार्थ: गोंधळ, गोंधळी यांना थारा नकोच!
two new US-India agreements
भारत आणि अमेरिकेने संरक्षण करारावर केली स्वाक्षरी; काय आहेत दोन नवीन करार? याचा भारताला कसा फायदा होणार?
Loksatta vyaktivedh Army Chief General Sundararajan Padmanabhan Terrorist attack army
व्यक्तिवेध: जनरल (नि.) एस. पद्मानाभन

रोहिंग्यांच्या प्रश्नामुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था, पर्यावरण, सुरक्षा, सामाजिक-राजकीय स्थिरता यावर परिणाम होत आहे. आपल्या मायदेशी परतण्याबाबतच्या अनिश्चिततेमुळे देशातील रोहिंग्यांमध्ये अनिश्चितता आहे. तसेच सीमेपलीकडे संघटित गुन्हेगारी, ड्रग्ज तस्करींचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत कट्टरपंथीयतेलाही खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. ही समस्या अशीच राहिली तर सुरक्षा आणि स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो, असे हसिना म्हणाल्या.

हेही वाचा >>>“मनमोहन सिंग असामान्य व्यक्ती पण…”, नारायण मूर्ती यांची यूपीए सरकारच्या कारभारावर टीप्पणी

बांगलादेशमधील रोहिंग्यांमुळे येथील सरकारपुढे आव्हान निर्माण झाल्याचेही शेख हसिना यांनी मान्य केले. आपल्या भाषणानंतर त्या एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. त्यांनी यावेळी भारत देशाचाही उल्लेख केला. रोहिंग्यांचा प्रश्न आमच्यासाठी मोठे आव्हान आणि ओझे आहे. भारत देश मोठा आहे. भारतामध्ये रोहिंग्यांना सामावून घेतले जाऊ शकते. मात्र तेथे रोहिंग्यांची संख्या कमी आहे. आमच्याकडे साधारण १.१ दसलक्ष रोहिंगे आहेत. त्यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय देशांशी सल्लामसलत करत आहोत. रोहिंग्यांना आपल्या मायदेशी पाठवण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवरही काही उपायोजना केल्या पाहिजेत, असे शेख हसिना म्हणाल्या.