रोहिंग्या निर्वासितांमुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था, पर्यावरण, सुरक्षा तसेच सामाजिक-राजकीय स्थैर्यतेवर गंभीर परिणाम होत आहे, असे प्रतिपादन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी केले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७७ व्या अधिवेशनात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांनी रोहिंग्या निर्वासितांच्या प्रश्नावर परिणामकारक भूमिका पार पाडावी, असे आवाहन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विश्लेषण : रोहिंग्या : निर्वासित की बेकायदा स्थलांतरित?

रोहिंग्यांच्या प्रश्नामुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था, पर्यावरण, सुरक्षा, सामाजिक-राजकीय स्थिरता यावर परिणाम होत आहे. आपल्या मायदेशी परतण्याबाबतच्या अनिश्चिततेमुळे देशातील रोहिंग्यांमध्ये अनिश्चितता आहे. तसेच सीमेपलीकडे संघटित गुन्हेगारी, ड्रग्ज तस्करींचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत कट्टरपंथीयतेलाही खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. ही समस्या अशीच राहिली तर सुरक्षा आणि स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो, असे हसिना म्हणाल्या.

हेही वाचा >>>“मनमोहन सिंग असामान्य व्यक्ती पण…”, नारायण मूर्ती यांची यूपीए सरकारच्या कारभारावर टीप्पणी

बांगलादेशमधील रोहिंग्यांमुळे येथील सरकारपुढे आव्हान निर्माण झाल्याचेही शेख हसिना यांनी मान्य केले. आपल्या भाषणानंतर त्या एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. त्यांनी यावेळी भारत देशाचाही उल्लेख केला. रोहिंग्यांचा प्रश्न आमच्यासाठी मोठे आव्हान आणि ओझे आहे. भारत देश मोठा आहे. भारतामध्ये रोहिंग्यांना सामावून घेतले जाऊ शकते. मात्र तेथे रोहिंग्यांची संख्या कमी आहे. आमच्याकडे साधारण १.१ दसलक्ष रोहिंगे आहेत. त्यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय देशांशी सल्लामसलत करत आहोत. रोहिंग्यांना आपल्या मायदेशी पाठवण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवरही काही उपायोजना केल्या पाहिजेत, असे शेख हसिना म्हणाल्या.

हेही वाचा >>> विश्लेषण : रोहिंग्या : निर्वासित की बेकायदा स्थलांतरित?

रोहिंग्यांच्या प्रश्नामुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था, पर्यावरण, सुरक्षा, सामाजिक-राजकीय स्थिरता यावर परिणाम होत आहे. आपल्या मायदेशी परतण्याबाबतच्या अनिश्चिततेमुळे देशातील रोहिंग्यांमध्ये अनिश्चितता आहे. तसेच सीमेपलीकडे संघटित गुन्हेगारी, ड्रग्ज तस्करींचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत कट्टरपंथीयतेलाही खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. ही समस्या अशीच राहिली तर सुरक्षा आणि स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो, असे हसिना म्हणाल्या.

हेही वाचा >>>“मनमोहन सिंग असामान्य व्यक्ती पण…”, नारायण मूर्ती यांची यूपीए सरकारच्या कारभारावर टीप्पणी

बांगलादेशमधील रोहिंग्यांमुळे येथील सरकारपुढे आव्हान निर्माण झाल्याचेही शेख हसिना यांनी मान्य केले. आपल्या भाषणानंतर त्या एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. त्यांनी यावेळी भारत देशाचाही उल्लेख केला. रोहिंग्यांचा प्रश्न आमच्यासाठी मोठे आव्हान आणि ओझे आहे. भारत देश मोठा आहे. भारतामध्ये रोहिंग्यांना सामावून घेतले जाऊ शकते. मात्र तेथे रोहिंग्यांची संख्या कमी आहे. आमच्याकडे साधारण १.१ दसलक्ष रोहिंगे आहेत. त्यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय देशांशी सल्लामसलत करत आहोत. रोहिंग्यांना आपल्या मायदेशी पाठवण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवरही काही उपायोजना केल्या पाहिजेत, असे शेख हसिना म्हणाल्या.