राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राजांचं उदाहरण देत निवडणुकांबाबत सूचक विधान केलं. “राजा चुकला तर त्याचं फळ निवडणुकीत मिळतं,” असं मत भागवत यांनी व्यक्त केलं. तसेच आपला समाज निसर्ग आणि परंपरेबाबत राजावर अवलंबून नसतो, असंही नमूद केलं. ते वाराणसीत बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले, आपला समाज निसर्ग आणि परंपरेबाबत राजावर अवलंबून नसतो. राजाचं काम असतं आणि तो ते काम करत असतो. राजाने त्याचं काम व्यवस्थित करावं हे समाजाला पहावा लागतं. लोकशाहीत जसं काम चालतं तसं. आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि ते देश चालवतात.”

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : लोकसभेला महायुतीच्या काय चुका झाल्या? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले, “आम्हाला अंदाजच नव्हता…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
senior leader eknath khadse says he is with sharad pawar faction of ncp
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच; ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे स्पष्टीकरण
nanded congress recommended vasant chavan s son for lok sabha by election
वसंत चव्हाण यांच्या मुलाला उमेदवारी देण्याची शिफारस; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेड जिल्हा काँग्रेसचा एकमताने ठराव
Mohan Bhagwat News
Mohan Bhagwat : “देवत्व लोकांनी ठरवावं”, मोहन भागवतांचा इशारा मोदींना तर नाही ना?
mla sudhir gadgil marathi news
सांगली: सुधीर गाडगीळ यांची निवडणुकीतून माघार, कार्यकर्त्यांकडून फेरविचाराची मागणी
Eknath Khadse is waiting for response from BJP
भाजपकडून प्रतिसादाची खडसे यांना प्रतीक्षा
Sangli, Sanjaykaka Patil, Legislative Assembly,
सांगली : एका पराभवाने खचणारा मी नाही! संजयकाका पाटील यांचे विधानसभेसाठी सुतोवाच

“राजा चुकला, तर त्याचं फळ निवडणुकीत मिळतं”

“आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं काम पाहतो, झोपत नाही. आपण हे लोकप्रतिनिधी काय करतात आणि काय नाही हे पाहत नाहीत. जे चांगलं काम करतात त्याचं फळ त्यांना मिळतं आणि जर राजा चुकला, तर त्याचंही फळ त्यांना निवडणुकीत मिळतं,” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : जागतिकीकरणाच्या थैमानाला उत्तर देणारा भारत निर्माण करायचा आहे; सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांचे मत

“भारतात प्राचीन काळात बळी दिला जायचा”

“परंपरा चालत आली आहे. त्यात खूप थोड्या गोष्टी आहेत ज्या वेळेनुसार बदलतात. ज्या गोष्टी बदलतात त्या बदलल्याच पाहिजे. भारतात प्राचीन काळात बळी दिला जायचा. आज जीवांचा बळी देत नाहीत. परंपरेची आठवण म्हणून लिंबू कापतात किंवा नारळ फोडतात. कारण बळी देण्यासाठी केली जाणारी हिंसा कालसुसंगत नाही, असं लक्षात आलं. त्यावेळी आपण वर्तन बदललं. वेळेनुसार बदलाव्या लागतात अशा खूप थोड्या गोष्टी आहेत. परंतु खूप साऱ्या गोष्टींमागे आपलं अध्यात्मिक विज्ञान आहे,” असंही भागवत यांनी नमूद केलं.