राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याहस्ते सोमवारी दोन पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. ‘भारत का मुसलमान’ व ‘मेरे पापा परमवीर’ ही ती दोन पुस्तकं असून १९६५ सालच्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेले शहीद अब्दुल हमीद यांच्या जीवनावर ही पुस्तकं आधारित आहेत. सोमवारी उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील हमीद यांचं मूळ गाव धामूपूरमध्ये ते बोलत होते. या पुस्तक प्रकाशनावेळी मोहन भागवत यांनी भारतातील सामाजिक सौहार्दावर आणि चीन व पाकिस्तानच्या आगळिकीवरही भाष्य केलं.

काय म्हणाले मोहन भागवत?

या कार्यक्रमाला मोहन भागवत यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी भारतातील विविधतेवर भाष्य केलं. “भारतात मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. पण तरीदेखील भारत एक राष्ट्र आणि एक समाज म्हणून अस्तित्व टिकवून आहे. आपल्याकडे वेगवेगळे धर्म, जाती, समाज आणि राज्य आहेत. आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो. पण एक देश म्हणून आपण सगळे एक आहोत”, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

pm narendra modi marathi news
इंदिरा गांधींनंतर नरेंद्र मोदी ठरणार ‘या’ देशाचा दौरा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान; तारीखही ठरली!
Pankaja Munde
विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मला शल्य…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Sudha murthy rajyasabha speech in marathi
Sudha Murthy in Rajyasabha : राज्यसभेतील सुधा मूर्तींच्या पहिल्याच भाषणाची तुफान चर्चा, ‘या’ दोन मागण्यांकडे लक्ष वेधल्याने सोशल मीडियावर कौतुक!
Ashok chavan in rajyasbha
“मी काँग्रेसमधून जिंकून आलो होतो, याचा मला अभिमान”, विरोधकांच्या टीकेला अशोक चव्हाणांचं चोख प्रत्युत्तर
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Uddhav Thackeray Express Photo By Ganesh shirsekar (1)
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : “मला सांगा, राहुल गाधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला?” उद्धव ठाकरेंचा थेट सवाल; म्हणाले, “प्रभू शंकराचा फोटो दाखवण्यावर…”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला, “वर्षभरापासून मणिपूर जळतं आहे, त्याकडे…”

पाकिस्तान व चीनशी झालेल्या युद्धांचा उल्लेख करताना मोहन भागवत म्हमाले, “आपल्या शत्रूराष्ट्रांशी झालेल्या युद्धादरम्यान भारतातील सर्व जातीचे, धर्माचे आणि राज्यांचे लोक आपल्या देशासाठी एक झाल्याचं आपण पाहिलं आहे”.

अब्दुल हमीद यांना मरणोत्तर परमवीर चक्र

भाषणाच्या आधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी अब्दुल हमीद व त्यांच्या दिवंगत पत्नी रसूलन बीबी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली दिली. १९६५ साली झालेल्या युद्धादरम्यान अब्दुल हमीद यांनी गाजवलेल्या शौर्याप्रीत्यर्थ त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने गौरवण्यात आलं.

“निवडणुकीत राजकीय पक्षांनी शिष्टाचार पाळला नाही, खरा सेवक…”, RSS प्रमुख मोहन भागवतांचं थेट विधान!

‘मेरे पापा परमवीर’ हे पुस्तक रामचंद्रन श्रीनिवासन यांनी लिहिलं असून ‘भारत का मुसलमान’ हे पुस्तक निवृत्त कॅप्टन मकसूद गाझीपुरी यांनी लिहिलं आहे.

मोहन भागवत-योगी आदित्यनाथ यांच्या भेटीची चर्चा!

काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली. यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळाली. यानंतर लोकसभा निवडणुकांमधील पक्षाच्या कामगिरीवर भाजपामध्ये सविस्तर चर्चा व विचारमंथन झाल्याचं सांगितलं जात आहे.