पाटणा : वेगवेगळ्या धर्मातील लोकांना शांततेत रहायचे असेल तर माणसाचा किंवा गायीचा, कोणाचाही झुंडबळी जाता कामा नये, असे वक्तव्य रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) वरिष्ठ पदाधिकारी इंद्रेशकुमार यांनी केले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातनिहाय जनगणनेच्या बाजूने व्यक्त केलेल्या मताबरोबर संघटना उभी असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांचे मत हे सर्व संघ स्वयंसेवकांचे मत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘जात हे वास्तव आहे. आपण ते नाकारू शकत नाही. त्यामुळे जातीचे हे विष जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. अनेक धर्म आहेत आणि असतील, आमचाही तोच दृष्टिकोन आहे. परंतु धार्मिक कट्टरता आणि त्यामुळे होणाऱ्या हिंसाचारापासून आपण सावध राहिले पाहिजे’, असे इंद्रेशकुमार म्हणाले.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
nsa ajit doval to visit russia for brics meeting
अजित डोभाल यांचा ‘ब्रिक्स’ बैठकीसाठी रशिया दौरा; रशिया-युक्रेन युद्धावर चर्चेची शक्यता
ratlam stone pelting
गणेश चतुर्थीला मिरवणुकीवर दगडफेक; मध्य प्रदेशातील रतलाममध्ये तणाव
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका

हेही वाचा >>> विधानसभेसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान? अशोक चव्हाण यांचा अंदाज

गोरक्षकांनी केलेल्या हत्यांवरून विरोधक भाजपला जबाबदार ठरवत आहेत. यावर इंद्रेशकुमार म्हणाले की, जगातल्या अनेक भागांत लोक मांस खातात. पण गायीबद्दल लोक संवेदनशील आहेत, हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला एक असे वातावरण तयार करायला हवे जिथे ना गायींची हत्या केली जाईल ना माणसांची. आपल्याला विविधतेतील एकता साजरी करायला हवी, असे मत त्यांनी मांडले.

‘आरएसएस’च्या बिहार शाखेने एका आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गणेश चतुर्थीला सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता पुढील वर्षी महाशिवरात्रीला होईल. दंगल आणि जातीय भेदभावापासून मुक्त असलेला समाज निर्माण करणे आणि गरीबांविषयी करूणाभाव हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे इंद्रेशकुमार यांनी सांगितले. मधेपुरा जिल्ह्यातील सिंहेश्वर महादेव मंदिर येथे हा कार्यक्रम होत आहे.