उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Hathras Stampede : “क्षमतेपेक्षा अधिक लोक जमले, भोले बाबांचा स्पर्श झालेली माती घेण्यासाठी गर्दी झाली”, FIR मधून धक्कादायक खुलासे!

supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
UP Hathras Stampede News in Marathi
Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरीत १२१ जणांचा बळी, भोले बाबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काही समाजकंटकांनी..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
bihar deputy cm samrat chaudhary cm nitish kumar
Video: “नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलंच”, म्हणत भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांनी पगडी काढली, मुंडन केलं आणि…
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

भारतातील रशियाच्या दुतावासाकडून एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोकसंदेश पाठवला आहे, असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेत आतापर्यंत १२० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मंगळवारी हाथरस एका सत्संगादरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली. यासंदर्भात बोलताना, “या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा हजारो लोक आले होते. भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळ असलेल्या नाल्यात पडले,” अशी माहिती उत्तर प्रदेशचे महासचिव मनोज कुमार सिंग यांनी दिली.

हेही वाचा – चेंगराचेंगरीत ११६ ठार; उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात दुर्घटना

याप्रकरणी आता आयोजकांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आयोजकाने या कार्यक्रमात सुमारे ८० हजार भाविकांना एकत्र येण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु, या संस्थेने यापूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी लाखो भाविक जमले होते हे उघड केले नव्हते. तसंच, मंगळवारच्या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यांतून आणि जवळपासच्या राज्यांतून सुमारे अडीच लाख लोक जमले होते. परवानगीच्या अटींचे पालन न केल्याने जीटी रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती, असं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.