Sanjay Kumar Verma on India-Canada Row : भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर मोठा वाद उद्भवला होता, जो अजूनही चालू आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाकडून सातत्याने केला जात होता. कॅनडाने आरोप केले असले तरी याप्रकरणी तिथलं जस्टिन ट्रुडो सरकार एकही पुरावा सादर करू शकलेलं नाही. दरम्यान, उभय देशांमधील वाद चिघळू लागल्यानंतर भारत सरकारने कॅनडामधील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांच्यासह इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना कॅनडातून बाहेर पडण्याचे आदेश दिले होते. ट्रुडो सरकारने निज्जरच्या हत्येचा संबंध भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांशी जोडल्यानंतर भारत सरकारने कडक पावलं उचलत कॅनडाला चोख उत्तर दिलं आहे. दरम्यान, संजय कुमार वर्मा यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर राजकीय फायद्यासाठी उभय देशांमधील संबंध बिघडवल्याचा आरोप केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा