पिकांना हमीभाव मिळावा यासाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. दोन्ही राज्यांमधील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. परंतु, केंद्र सरकारने या शेतकऱ्यांना दिल्लीपासून दूर रोखलं आहे. पोलिसांनी रस्ते बंद केले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी या शेतकऱ्यांवर लाठीहल्ले केले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी त्यांच्यावर अश्रूधुराचा मारा केला. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांची देशभरात चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाने आतापर्यंत तीन वेळा शेतकऱ्यांच्या प्रतिनिधिंशी चर्चा केली. परंतु, या तिन्ही चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. अशातच शेतकऱ्यांनी आता सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे शेतकरी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शंभू सीमा आणि खनौरी सीमेवरून शांततापूर्ण वातावरणात दिल्लीच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात करतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा