उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन धोरण जाहीर केलं आहे. या धोरणानुसार उत्तर प्रदेशमध्ये दोनच अपत्यांची सक्ती केली जाणार आहे. मात्र, या धोरणाना विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला आहे. हिंदूंचा जन्मदर २ टक्क्यांच्या खाली आणणं त्यांना मान्य नाही. त्यासोबतच राजकीय वर्तुळातून देखील या धोरणावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर खोचक टिप्पणी केली आहे. “लोकसंख्येच्या स्फोटामुळे महागाईपासून बेरोजगारीचे अराजक निर्माण झाले. शिक्षण, आरोग्य याबाबत व्यवस्था निर्माण करण्यात सरकार अपुरे पडले. आता करून भागले आणि लोकसंख्या नियंत्रणाला लागले”, अशा शब्दांत संजय राऊतांनी लोकसंख्या धोरण, योगी सरकार आणि भाजपावर टीका केली आहे. ‘सामना’च्या रोखठोक या सदरामध्ये त्यांनी भाजपावर या धोरणावरून निशाणा साधला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा