लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं राजकीय वातावरण तापू लागल्याचं दिसत आहे. एकीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडल्यामुळे विरोधकांना धक्का बसलेला असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांचा जोरदार प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देशात सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ईव्हीएम व चंदीगडमधील घडामोडींचा संदर्भ देत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

“भारतीय जनता पक्ष डरपोक”

भारतीय जनता पक्ष हा एक डरपोक पक्ष आहे, अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली. “भाजपा हा डरपोक पक्ष आहे. लोकांमध्ये जायची त्यांच्यात हिंमत नाहीये. इव्हीएम किंवा चंदीगड पॅटर्न नसेल, तर भाजपा जिंकू शकत नाही” असं ते म्हणाले. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “उत्तर प्रदेशच्या चंदौलमध्ये एका दुकानात २०० इव्हीएम मशीन मिळाल्या आहेत. तो भाजपाचा पदाधिकारी आहे. आसाममध्ये एका ट्रकमध्ये ३००हून जास्त इव्हीएम मशीन सापडल्या. तो ट्रकही भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. हा काय खेळ आहे?” असा सवाल त्यांनी केला.

Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
फडणवीस सरकारची जन्म दाखल्यांवर करडी नजर; बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम (फोटो सौजन्य पीटीआय)
‘Vote Jihad 2’: फडणवीस सरकारची बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम; आता जन्म दाखल्यांवर करडी नजर

मनसुखभाई व चंदीगड पॅटर्न!

दरम्यान,भाजपा आता मनसुखभाई किंवा चंदीगड पॅटर्ननेच निवडणुका लढवणार असल्याचं राऊत म्हणाले. “इव्हीएम बनवणाऱ्या सरकारी कंपनीवर (भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड) भाजपाचे चार संचालक नियुक्त केले गेले. इव्हीएममधला गुप्त कोड तिथेच तयार होतो. पण संचालकांपैकी बहुतेक संचालक गुजरातचे आहेत. २०२४ मध्ये कशा प्रकारे निवडणुका लढवल्या जातील, त्याची ही तयारी आहे. दोन पॅटर्न आहेत. एक मनसुखभाई पॅटर्न, जे इव्हीएम बनवणाऱ्या कंपनीचे संचालक झाले आहेत. दुसरा चंदीगड फॉर्म्युला. तिथे काँग्रेस व आपनं निवडणूक जिंकली. पण तरीही भाजपा हे मानायला तयार नाही. मतपत्रिकांचं अपहरण केलं गेलं आणि ते गादीवर बसले”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पालिकेचा अजब कारभार; फक्त सत्ताधारी आमदारांनाच दिला ५०० कोटींचा विकासनिधी, धक्कादायक प्रकार उघडकीस!

काय घडलं चंदीगडमध्ये?

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी चंदीगडमधील राजकीय घडामोडींचा दाखला दिला. “या देशात भाजपा सरळ लोकशाहीच्या मार्गानं कोणतीही निवडणूक जिंकू शकत नाही. ईव्हीएम हटली तर भाजपा गेली. इव्हीएम है तो मोदी है. चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत होतं. दोघांच्या मिळून २० जागा होत्या. भाजपाकडे १४ जागा होत्या. मतदान आप व काँग्रेसच्या बाजूने झालं. पण तरीही पीठासीन व्यक्तीनं ८ मतं बाद केली. विजयी होत असलेल्या काँग्रेस-आप युतीच्या महापौराला पराभूत दाखवून भाजपाचा महापौर विजयी ठरवला. हा चंदीगड पॅटर्न भाजपानं आणला आहे”, असं राऊत म्हणाले.

“आम्ही वाचलं होतं की सीतेचं अपहरण रावणानं केलं. पण चंदीगडमध्ये लोकशाहीरुपी सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं”, असा टोलाही त्यांनी लगावला.

Story img Loader