“मी वाराणसीत गेलो होतो. रात्रीची वेळ होती. तिथे बाजा वाजताना मी पाहिला. बाजाच्या संगीतावर युपीचं भविष्य रस्त्यात नाचताना मी वाराणसीत बघितलं”, अशी टीका राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आज वाराणसीमध्ये अमूल प्लांट कॉम्प्लेक्समध्ये १३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ३५ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान म्हणाले, “राहुल गांधींनी मोदींना शिव्या देत दोन दशके घालवली, पण आता देवासारखे लोक असलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणांविरोधात ते बोलत आहेत. जे स्वतः नशेत आहेत ते उत्तर प्रदेश आणि माझ्या काशीच्या मुलांना नशाखोर म्हणत आहेत. अहो अतिपरिवारवादी, काशीचा तरुण उत्तर प्रदेशच्या विकासात व्यस्त आहे, तो आपले समृद्ध भविष्य लिहिण्यासाठी सर्वतोपरी मेहनत करत आहे. इंडिया आघाडीने उत्तर प्रदेशातील तरुणांचा केलेला अपमान कोणीही विसरू शकणार नाही.”

The attack on Baba Siddiqui reverberated across the country Mumbai crime news
हत्येनंतर राजकीय वादळ; बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याचे देशभरात पडसाद
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Baba Siddique with Salman Khan and Shahrukh Khan iftar party
Baba Siddiqui Murder: सामान्य कार्यकर्ता ते मंत्री, बॉलीवूडमध्येही चलती; बाबा सिद्दीकींचा राजकीय प्रवास कसा होता?
Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
Chandrashekhar Bawankule, Candidates, merit,
बावनकुळे म्हणाले, उमेदवारांचा निर्णय जातीच्या आधारावर….
Hitendra Thakur, Rajiv Patil, Hitendra Thakur latest news,
प्रत्येकाला स्वत:ची मते असतात – हितेंद्र ठाकूर; राजीव पाटील पक्षांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया
Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात युवक मद्याच्या नशेत रस्त्यावर नाचताना पाहिले, राहुल गांधींची टीका

मोदी म्हणाले, “हे अतिपरिवारवाद्यांचे वास्तव आहे. कुटुंबातील सदस्यांना नेहमीच युवा शक्तीची भीती वाटते. तरुण प्रतिभांना घाबरतात. सामान्य तरुणाला संधी मिळाली तर ते सर्वत्र आव्हान देतील, असं त्यांना वाटतं. त्यांना तेच लोक आवडतात जे रात्रंदिवस त्यांचा जयजयकार करत असतात. काँग्रेस पक्षावर निंदा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “परिवारवाद’, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेश अनेक दशकांपासून विकासात मागे राहिला आहे.”

आर्थिक महसत्ता बनेल

पंतप्रधान म्हणाले, “मोदींचा तिसरा कार्यकाळ हा संपूर्ण जगात भारताच्या सत्तेचा सर्वात महत्त्वाचा काळ असणार आहे. हा सर्वात तीव्र कार्यकाळ असणार आहे. यामध्ये भारतातील प्रत्येक आर्थिक, सामाजिक, सामरिक, सांस्कृतिक क्षेत्र नवीन उंची गाठेल. गेल्या दहा वर्षांत भारत ११ व्या क्रमांकावरून पाचवी आर्थिक शक्ती बनला आहे. येत्या पाच वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनेल. तसंच, मी हमी दिली आहे की दुर्लक्षित असलेल्या पूर्व भारताला विकसित भारतासाठी प्रगतीचे इंजिन’ बनवतील, असंही ते म्हणाले.