पीटीआय, सिवान

बिहारच्या सिवान जिल्ह्यातील गंडकी नदीवरील पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या १५ दिवसांत बिहारमधील पूल कोसळण्याची ही ७वी तर सिवान जिल्ह्यातील गेल्या ११ दिवसांतील ही दुसरी घटना ठरली आहे.

UP Hathras Stampede News in Marathi
Hathras Stampede : मृतांच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे समोर; डॉक्टर म्हणाले, “छातीत..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Crime News
१५ वर्षांपूर्वी झालेल्या महिलेच्या हत्येचं रहस्य निनावी पत्रामुळे उलगडलं, कुठे घडली घटना?
Army chief reviews security in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा लष्करप्रमुखांकडून आढावा
UP Hathras Stampede News in Marathi
Hathras Stampede : “गर्दी आणि देणगी जमवण्याकरता…”, अटक केलेल्या सेवेकऱ्यांची पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती!
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा

सिवान जिल्ह्यातील देवारिया भागातील गंडकी नदीवरील हा छोटा पूल अनेक गावांना महाराजगंजशी जोडतो. उपविकास आयुक्त मुकेश कुमार यांनी सांगितले की, घटनेनंतर या भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पुलाची पाहणी केली. या घटनेची चौकशी केली जात आहे. सकाळी ५च्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या पुलाची उभारणी १९८२-८३ मध्ये झाली होती. त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. त्यातच मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाहातील पाण्यामुळे पुलाची रचना कमकुवत होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली होती. त्यातच बुधवारी सकाळी हा पूल कोसळल्याचे कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा >>>‘भोलेबाबा’च्या आश्रमाबाहेर बंदोबस्त; मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

सिवान जिल्ह्यात गंडकी नदी पूल दुर्घटनेच्या ११ दिवसांपूर्वीच, २२ जून रोजी दारुंडा भागातील नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला होता. तसेच बिहारमधील मधुबामी, अरारियास, पूर्व चम्पारण आणि किशनगंज जिल्ह्यातही गेल्या दोन आठवड्यांत पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी बिहारमधील बांधकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या दुर्घटनांच्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.