मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील तसेच देशातील प्रमुख पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत दावा केला होता की लवकरच मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार येईल. शिवराज सिंह चौहान यांचं सरकार जाऊन तिथे कमलनाथ यांचं सरकार येईल. राहुल गांधींच्या या दाव्याला स्वतः मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्तर दिलं आहे. ते एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते.

शिवराज सिंह चौहान म्हणाले, गालिबचे हे विचार मनोरंजनासाठी चांगले आहेत. मला समजत नाहीये राहुल कधी परिपक्व होणार? कधी ते शेतात पेरणी करताना दिसतात, तर कधी ट्रकने प्रवास करतात, अरे भावा आम्ही स्वतः शेती केली आहे. राहुल गांधी ट्रकने प्रवास करून ट्रकचालक आणि क्लीनर्सशी बोलतात. तर कधी शेतकऱ्याला घरी बोलावतात आणि त्याच्याशी बोलतात. मला समजत नाही त्यांना नेमकं काय करायचं आहे.

BMC budget 2025 news in marathi
पालिकेच्या अर्थसंकल्पाला मालमत्ता कराचा हात; १२५० कोटींनी उद्दिष्ट वाढले; ७५ टक्के मालमत्ता कर वसूल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
Budget 2025 Is By The People, For The People, Says FM nirmala sitharaman
अर्थसंकल्प केवळ लोकांचा, लोकांसाठी – सीतारामन; मोदी यांच्या आग्रहामुळेच करकपात केल्याची माहिती
union budget 2025
अग्रलेख: ‘मधुबनी’में लोकशाही…
girish kuber
जुनी करप्रणाली अप्रत्यक्ष मोडीतच;‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात तज्ज्ञांचे मत
Rahul Gandhi On Budget 2025
Rahul Gandhi : “ही तर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर मलमपट्टी”, अर्थसंकल्पावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?

हे ही वाचा >> शरद पवारांची भेट चोरडियांच्याच घरी का घेतली? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण!

मुख्यमंत्री चौहान म्हणाले, राहुल गाधी कधी एखाद्या वैराग्यासारखे दिसतात, जसं की त्यांना आता कुठल्याच मोहमायेत पडायचं नाही. त्यांच्यात परिपक्वता कधी येणार? मला त्यांच्यात आजवर कधीच परिपक्वता दिसली नाही. त्यामुळेच ते अशा प्रकारची वक्तव्ये करतात. ते त्यांच्यासाठी सोपं आहे. त्यांनी आता खरंच परिपक्व व्हायला हवं. आता त्यांचं वयसुद्धा वाढलं आहे. माझ्या मते त्यांचं वय आता ५० च्या पुढे गेलं आहे बहुतेक. कमलनाथ मुख्यमंत्री होतील असं ते (राहुल गांधी) सहज बोलून जातात,

Story img Loader