पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मोदींच्या भाषणामधूनही या दौऱ्यामागील राजकीय हेतू दिसून आला. पंतप्रधान मोदींनी त्यांची जात तसेच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. मात्र याच विषयावरुन आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ गटाने मोदींना लक्ष्य केलं आहे. जम्मू-काश्मीर नेहरुंमुळे तातडीने भारतात विलीन करुन घेण्यात आलं नाही असं म्हणणाऱ्या मोदींना जम्मू-काश्मीरमध्ये सध्या काश्मिरी पंडितांची अवस्था काय आहे याची आठवण करुन दिली आहे. तसेच पंतप्रधानांना आताच्या भाषणात जात काढण्याची काहीच गरज नव्हती असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा