झारखंडच्या जमशेदपूर येथून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक दुःखद बातमी समोर आली आहे. झारखंडमध्ये नववर्षाची पार्टी करून घरी परतणाऱ्या आठ मित्रांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. जमशेदपूर येथील बिष्टूपूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्किट हाऊस परिसरात सदर अपघात झाला. अपघात इतका भीषण आहे की, त्यात गाडीचा चुराडा झाल्याचे दिसत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात चाललेली गाडी पहिल्यांदा रस्त्याच्या दुभाजकाला आदळली आणि त्यानंतर पुढे जाऊन झाडावर आदळून उलटली.

गाडी झाडावर आदळून उलटली तेव्हा त्याचा आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकायला गेला. ज्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली. गाडीमध्ये बसलेले सहा युवक जागीच ठार झाले तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडीतील मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिले. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविले. मृत युवक कुलुप्तांगा भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते.

Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Two attempted self immolations occurred in Jalgaon and Nashik districts on Republic Day January 26
जळगाव, नाशिक जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी दोघांचा पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
pune pmp bus driver accident news
पुणे : डंपरच्या चाकाखाली सापडल्याने पीएमपी चालकाचा मृत्यू, वानवडीतील घटना; चालक ताब्यात
Nepal citizens died , Jalgaon train accident, Jalgaon ,
जळगाव रेल्वे दुर्घटनेत नेपाळी नागरिकांचा मृत्यू
Pushpak Train, Jalgaon Pushpak Train ,
जळगावपूर्वी असा भीषण रेल्वे अपघात कुठे झाला होता ? हावडा एक्स्प्रेसने चिरडले होते…
fire, car showroom, Santacruz, Mumbai,
मुंबई : सांताक्रुझमधील गाड्यांच्या शोरूमला भीषण आग

जमशेदपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक कौशल किशोर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, पाच जण बसण्याची क्षमता असलेल्या गाडीत आठ युवक बसले होते. गाडी पहिल्यांदा रस्त्याच्या दुभाजकाला आदळली आणि त्यानंतर पुढे असल्येल्या झाडावर फेकली गेली. गाडीतील पाच युवक जागीच ठार झाले, तर इतर तिघांना रुग्णालयात नेले असताना त्यापैकी एकाचा वाटेतच मृत्यू झाला. दोघांवर उपचार सुरू आहेत. गाडी अतिवेगात होती, असेही ते म्हणाले.

कौशल किशोर पुढे म्हणाले की, या अपघाताची तीव्रता इतकी होती की, आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटर आणावे लागले होते. हे सर्व तरूण लिट्टी पार्टी (बिहारमधील लोकप्रिय प्रकार) करण्यासाठी रविवारी रात्री गेले होते. पहाटे ४.३० वाजता ते जमशेदपूरला जाण्यासाठी निघाले, यावेळी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना हा प्रवास करून नका, असे बजावले होते. मात्र तरीही युवक भल्या पहाटे घरी येण्यासाठी निघाले.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट टाकून त्यांनी शोक व्यक्त केला.

“जमशेदपूरमध्ये झालेल्या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला, ही बातमी दुःखद आहे. परमेश्ववर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी आशा व्यक्त करतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री सोरेन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Story img Loader