पीटीआय, नवी दिल्ली

पुरेशी प्रथिने आणि अनेक जीवनसत्त्वांचा (मल्टिव्हिटॅमिन) समावेश असलेल्या मासिक आहार योजनेमुळे भारतातील क्षयरुग्णांच्या (टीबी) कुटुंबसदस्यांना क्षयरोगाचा संसर्ग होण्याचे प्रमाण निम्म्याने कमी होते. त्यामुळे नवे रुग्ण निर्माण होत नाहीत. परिणामी क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्युदरातही घट होते, असा निष्कर्ष ‘द लॅन्सेट’ या जागतिक आरोग्य विज्ञानपत्रिकेत (ग्लोबल हेल्थ जर्नल) प्रकाशित झालेल्या संशोधनाद्वारे मांडण्यात आला आहे.

Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
mhada Reduce Consent Requirement of building owner for Group Redevelopment
समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!
The migration in 2022, supported by airborne foster parents.
नामशेष होत चाललेले पक्षी, हरवलेले स्थलांतराचे मार्ग आणि विमानातून मार्गदर्शन; संवर्धनतज्ज्ञ नेमके काय करत आहेत?
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
significant reduction in infant mortality in the state
राज्यात बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट!
health experts advise drummers for relief from permanent pain due to drumming
Pain From Drumming : ढोल-ताशावादनामुळे जडतेय कायमचे दुखणे! आरोग्यतज्ज्ञांचा वादकांना काळजी घेण्याचा सल्ला

संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने झारखंडमधील चार जिल्ह्यांत हा अभ्यास केला. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात फुप्फुसाच्या क्षयरोगाच्या दोन हजार ८०० रुग्णांच्या कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला. रुग्णांना सहा महिन्यांसाठी मासिक दहा किलोग्रॅम शिधा (तांदूळ, डाळी, दूध पावडर, तेल) आणि पूरक जीवनसत्त्वे (मल्टिव्हिटॅमिन) देण्यात आली. तर कुटुंबातील सदस्यांना दरमहा पाच किलो तांदूळ आणि दीड किलो डाळ असा शिधा दिला.

नवीन आहारपद्धती सुरू झाल्यानंतर क्षयरुग्णांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली. रुग्णसंपर्कामुळे त्यांना क्षयरोगाचा संसर्ग होतो का, याच्या अभ्यासासाठी सर्व सहभागींचा ३१ जुलै २०२२ पर्यंत सक्रिय पाठपुरावा करण्यात आला. ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२१ दरम्यान, दहा हजार ३४५ क्षयरुग्ण संपर्कातील कुटुंबीयांचे दोन गटांमध्ये विभागून निरीक्षण करण्यात आले. या अभ्यासातील जवळपास दोन तृतीयांश लोक संथाल, हो, ओरांव आणि भूमिज यांसारख्या स्थानिक समुदायातील होते आणि जवळपास ३४ टक्के (१०,३४५ पैकी ३,५४३) कुपोषणग्रस्त होते.

पोषक आहाराचा सकारात्मक परिणाम

अभ्यासातून असे आढळले की पोषक आहार मिळाल्यानंतर फुप्फुसाचा क्षय झालेल्या रुग्णांची संख्या ४० टक्के कमी झाली तर संसर्गजन्य क्षयरुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी घटली. जवळपास निम्म्या रुग्णांचे बॉडी-मास-इंडेक्स (बीएमआय) १६ पेक्षा कमी होते आणि मृत्युदर ३५ ते ५० टक्के होता. पौष्टिक आहारामुळे पहिल्या दोन महिन्यांत त्यांचे वजन वाढले आणि मृत्यूचे प्रमाण ६० टक्क्यांनी घटले.

क्षयबाधितांचा जीव वाचवणे आणि प्रकृती सुधारण्यासाठी क्षयरोगांवरील उपचारांत आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. कुपोषित रुग्णांमध्ये क्षयाचा उच्च प्रसार आणि तीव्रता यामुळे मृत्यूचा धोका वाढतो, त्यामुळे भारताच्या संदर्भात रुग्णसेवेमध्ये पोषक आहार हा आवश्यक भाग असला पाहिजे. – अनुराग भार्गव, संशोधक