जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० मोदी सरकारने रद्द केल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर गेलं आहे. या याचिकेत केंद्राने कलम ३७० रद्द करणे आणि जम्मू व काश्मीरचा राज्याचा दर्जा रद्द करून केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले. या प्रकरणी सुनावणी करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने बुधवारी (२३ ऑगस्ट) महत्त्वाचं विधान केलं आहे.

सरन्यायाधीश म्हणाले, “कलम १ हे संविधानाचा कायमस्वरुपी भाग आहे. कलम ३७०(१) मध्ये कलम १ लागू असेल याचा समावेश असेल हा संदर्भ असण्याचं कारण काय होतं? कलम १ हे कोणत्याही प्रकरणात लागू होतं. तो संविधानाचा अविभाज्य भाग आहे.”

High Court asked the state if there's evidence against Saurabh Tripathi and Ashutosh Mishra
अंगाडिया खंडणी प्रकरण : IPS अधिकरी सौरभ त्रिपाठींविरोधात पुरावे आहेत का? उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
dr ajit ranade continues as gokhale institute vc till october 7 bombay hc
डॉ. अजित रानडे हे ७ ऑक्टोबरपर्यंत कुलगुरूपदी कायम; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Interrogation of Siddaramaiah by Lokayukta Police Decision of the Special Court
सिद्धरामय्यांची लोकायुक्त पोलिसांकडून चौकशी; विशेष न्यायालयाचा निर्णय, गुन्हा दाखल होणार
Rahul Gandhi on veer Savarkar
राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रारीची विशेष न्यायालयात सुनावणी, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान
ram jhula hit and run case
“तांत्रिक कारणांमुळे न्याय पराभूत होता कामा नये”, रितू मालू प्रकरणी सत्र न्यायालय म्हणाले…
supreme court on cbi in arvind kejriwal bail case
“CBI ची तुलना पिंजऱ्यातल्या पोपटाशी…”, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पुन्हा केली ‘त्या’ उक्तीची आठवण; नेमकं काय घडलं होतं तेव्हा?
Arvind Kejriwal Bail
Arvind Kejriwal Bail : ‘कार्यालयात जाता येणार नाही, फाईल्सवर सही करता येणार नाही’, केजरीवालांना न्यायालयाने कोणत्या अटींवर जामीन मंजूर केला?

“कलम १ संविधानाचा कायमस्वरुपी भाग आहे”

“कलम ३७० कायमस्वरुपीसाठी असतं, तर त्यात कलम १ चा संदर्भ देण्याची कोणतीही गरज नव्हती. कलम १ संविधानाचा कायमस्वरुपी भाग आहे. त्यामुळेच कलम ३७० मध्ये बदल होऊ शकत असल्याने कलम १ चा संदर्भ देण्यात आला. संविधानकर्ते फार हुशार होते, त्यांना माहिती होतं की कलम १ कधीही बदलता येणार नाही,” असंही सरन्यायाधीशांनी नमूद केलं.

हेही वाचा : ईशान्य राज्यांच्या विशेष तरतुदी हटविण्याचा हेतू नाही; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण

“जम्मू काश्मिरच्याबाबत प्रक्रियेचं पालन नाही, अधिकारांचा दुरुपयोग”

अॅड. गोपाल शंकरनारायणन म्हणाले, “कलम ३ नुसार कोणत्याही राज्याच्या विशिष्ट भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याचे सरकारकडे अधिकार आहेत. असं करण्यासाठी एक निश्चित प्रक्रिया आहे. जम्मू काश्मिरच्याबाबत ही प्रक्रिया पाळली गेलेली नाही. हा अधिकारांचा दुरुपयोग आहे.”