अफगाणिस्तानमध्ये तालिबान दहशतवादी एक एक करत शहरांवर ताबा मिळवत आहे. आता तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्ताच्या काबुलमध्ये प्रवेश केला आहे. तसेच देशातील सर्वच सीमा ताब्यात घेतल्या आहेत. याबाबतची माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी काबुलच्या कलाकान, काराबाग आणि पगमान जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तसेच लोकांमध्ये दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे.

तालिबानने सत्ता परिवर्तन करण्याची मागणी केली आहे. त्यावर अफगाणिस्तानचे काळजीवाहू गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्जकवाल यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. “काबुलवर हल्ला होणार नाही. सत्ता परिवर्तंन शांततापूर्वक मार्गाने होईल.”, असं गृहमंत्री मिर्जकवाल यांनी टोलो न्यूजला सांगितलं, दुसरीकडे तालिबानंही जबरदस्तीने काबुल ताबा मिळवणार नाही असं सांगितलं आहे. सर्वांना सत्ता परिवर्तन हवं आहे. सत्ता परिवर्तन शांततेत झालं, तर कोणतंही नुकसान होणार नाही, असं तालिबानकडून सांगण्यात आलं आहे.

stalled housing projects in mumbai will be completed in phased manner says dcm eknath shinde
मुंबई बाहेर फेकले गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
US to extradite Pakistani terrorist Tahawwur Rana to India
२६/११ चा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिका भारतात पाठवणार… मुंबई हल्ल्यात नेमका सहभाग काय?
girish mahajan chhagan bhujbal l
छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार? गिरीश महाजन म्हणाले…
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Afghan National Arrested For Illegally Staying In India For 17 Years
भारतात १७ वर्षांपासून बेकायदा राहणाऱ्या अफगाणी नागरिकाला मायदेशी पाठविण्याचे आदेश
14 suspected Maoists killed during joint operation by Odisha and Chhattisgarh police
ओडिशा आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १२ संशयित माओवादी ठार; शस्त्रे आणि दारुगोळा जप्त

यापूर्वी शनिवारी तालिबाननं जलालाबादवर ताबा मिळवला होता. यानंतर काबुल शहरच उरलं होतं. काबुल हे शहर तालिबान दहशतवाद्यांपासून सुरक्षित मानलं जातं होतं. मात्र आता या शहरावरही तालिबानने कुच केली आहे. जलालाबादवर ताबा मिळवत तालिबानने राजधानी काबुलला देशाच्या पूर्व भागापासून वेगळं केलं होतं. जलालाबादच्या राज्यपालांना कोणताही संघर्ष न करता आत्मसमर्पण केलं होतं. सामान्य नागरिकांचं नुकसान टाळण्यासाठी त्यांनी असं केलं आहे.

“…तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावं लागेल”; सरसंघचालक मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

अफगाणिस्तानला लागून असलेल्या तोरखम सीमेवर पाकिस्ताननं कडेकोट सुरक्षा ठेवली आहे. अपगाणिस्तानातील स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशिद अहमद यांनी सांगितलं., अफगाण पोलिसांनी तालिबानसमोर आत्मसमर्पण केलं आहे. त्यामुळे सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं शेख राशिद अहमद यांनी सांगितलं आहे.

Story img Loader