गेल्या महिन्याभरात बिहारच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. महिन्याभरापूर्वी भाजपा व मोदींविरोधातील विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी जोरकसपणे प्रयत्न करणारे नितीश कुमार स्वत:च भाजपाप्रणीत एनडीए आघाडीत जाऊन बसले. बिहारमध्ये सत्तापालट झाला आणि राजदला दूर लोटून भाजपासोबत नितीश कुमार यांनी सरकार स्थापन केलं. यानंतर सोमवारी नितीश कुमार यांच्या बहुमत चाचणीवर बिहार विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान राजद आमदार व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी तुफान टोलेबाजी केली.

“मी नितीश कुमारांचा आदर करतो, करत राहीन”

नितीश कुमार यांना चिमटे काढताना तेजस्वी यादव यांनी आपण त्यांचा कायम आदर करत राहू, असं विधान केलं. “मुख्यमंत्री कायम हेच म्हणत राहिले की मी त्यांच्या मुलासारखा आहे. मीही त्यांना माझा पालक मानतो. तुम्ही प्रभू श्रीरामाची चर्चा करता. आपल्या सगळ्यांच्या मनात राम आहेतच. पण जसे प्रभू श्रीरामाचे वडील दशरथ होते तसेच आम्ही नितीश कुमार यांना आमचे पालक मानतो”, असं तेजस्वी यादव म्हणताच सभागृहात हशा पिकला!

nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
Rahul Gandhi Critized Mohan Bhagwat
Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत मोहन भागवतांचं नाव घेताच गदारोळ; म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न…”
Rohit Sharma Viral Video of BCCI Awards on Smriti mandhana Question
VIDEO: “माझी बायको बघत असेल…”, विसरभोळ्या रोहित शर्माचं स्मृती मानधनाच्या प्रश्नावर भलतंच उत्तर; नेमकं काय घडलं?
Police Officer mixes ash in food for devotees Viral Video
Maha Kumbh 2025 : पोलिसाने महाकुंभमेळ्यातील भाविकांसाठी शिजवल्या जाणाऱ्या अन्नात कालवली राख; Video Viral झाला अन्…
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान

“नितीश कुमार दशरथ, पण आम्हाला वनवास नाही”

“अनेकदा नितीश कुमार म्हणालेत की ‘आता तर हाच सगळं करेल, हाच सगळं पुढे नेईल’. तरुणच पुढे जाणार ना? पण हेही खरंय की अनेकदा यांचे काही नाईलाज झाले असतील. जसे राजा दशरथाचे झाले होते, ज्यामुळे त्यांनी प्रभू श्रीराम यांना वनवासाला पाठवलं. पण आम्ही असं मानतो की आम्ही वनवासाला आलेलो नाही. नितीश कुमार यांनी आम्हाला जनतेमध्ये जनतेचं सुख-दु:ख जाणून घेण्यासाठी पाठवलं आहे”, असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला.

नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार नाहीत, ही मोदी गॅरंटी आहे का? तेजस्वी यादव यांची टीका

“आधी आमचे खटले ऐकवले, नंतर भाजपाची फसवणूक”

दरम्यान, नितीश कुमार यांनी सातत्याने बाजू बदलल्याचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी वेळोवेळी दिलेली कारणं तेजस्वी यादव यांनी सभागृहात सांगितली. “आधी जेव्हा त्यांनी आम्हाला दूर लोटलं, तेव्हा त्यांचा काय नाईलाज होता हे मला माहिती नाही. कुणालाच माहिती नाही. पण तेव्हा ते एकच म्हणाले की तुमच्यावर खटले आहेत. मग जेव्हा त्यांनी आम्हाला जवळ केलं तेव्हा म्हणाले की भाजपावाले फसवतात. ईडी-सीबीआय मागे लावण्याचं काम करतात. मी त्यांना मान देतोच. पण बिहारच्या जनतेला हे जाणून घ्यायचंय की असं काय कारण आहे ज्यासाठी तुम्ही कधी इथे तर कधी तिथे असता?”, असा खोचक सवालही तेजस्वी यादव यांनी केला.

“२०२० मध्ये तुम्ही एनडीए सोडलं तेव्हा एवढंच म्हणाले की भाजपा आमचा पक्ष तोडत आहे. पक्ष सोडण्यासाठी आमच्या आमदारांना प्रलोभनं दिली जात आहेत. तुम्ही म्हणाले होते की तुम्हाला पंतप्रधान वगैरे काहीही व्हायचं नाहीये. देशभरातल्या विरोधकांना एकत्र करून हुकुमशाहाला पुन्हा सत्तेत येऊ द्यायचं नाही असंच तुम्ही म्हणाले होते. पण काल तुम्ही राज्यपाल भवनातून बाहेर आलात, तेव्हा म्हणालात की तुमचं आघाडीच मन लागत नाही. आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी नाचगाणं करण्यासाठी होतो का?” असाही प्रश्न यादव यांनी उपस्थित केला.

Story img Loader