मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत कुठलाही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. तर दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून पलायन केलं आहे. एक उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पेटलेला असताना छत्तीसगढमध्ये प्रचाराला गेले आहेत. छत्तीसगढचा प्रचार महत्त्वाचा की महाराष्ट्रातली परिस्थिती महत्त्वाची? दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना राजकीय डेंग्यू झाला आहे. ते या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू झाला आहे. कुठला मच्छर चावला बघावं लागेल असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.

फडणवीसांनी राजीनामा द्यावा

देवेंद्र फडणवीस हे स्वतःला खूप जबाबदार, कर्तबगार समजतात. राज्याची त्यांना खडा न् खडा माहित आहे. त्यांच्याकडे गृहमंत्रीपदही आहे. राज्य मराठा आरक्षणावरुन पेटलं आहे. लोकप्रतिनिधींची घरं पेटवली जात आहेत. तरीही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री प्रचाराला गेले आहेत. मंत्र्यांना गावबंदी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आंदोलन चिघळत चाललं आहे. आज ते बोलताना पडले असंही मला दिल्लीत समजलं. अशात गृहमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन भाषणं करत आहेत? त्यांचा तातडीने राजीनामा घेतला गेला पाहिजे अशीही मागणी संजय राऊत यांनी केली आहे. सगळ्या आंदोलकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे.

shiv sena bjp conflict over regularizing construction built by project victims in navi mumbai and panvel
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नवी मुंबईत महायुतीतच धुसफुस ?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : सिंह यांचा राजीनामा घेणेच हिताचे
Ajit Pawar, Ajit Pawar rebuked municipal commissioner,
“तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका”! तरुणीच्या अर्जावरुन अजित पवारांनी पालिका आयुक्तांना खडसावलं
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही

कुठे आहे कायद्याचं राज्य?

गावबंदी वगैरे जे काही प्रकार आहेत ते सुरु राहतीलच. मात्र गृहमंत्री ज्या बेदरकारपणे वागत आहेत त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असंही संजय राऊत म्हटलं आहे. मंत्र्यांना गावात येऊ दिलं जात नाही. आमदारांची घरं पेटवली जात आहेत. रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली जाते आहे कुठे आहे कायद्याचं राज्य? कायद्याचं राज्य हे फक्त विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी आणि त्यांच्यावर खोटे खटले दाखल करण्यासाठी आहे का? हे काही सरकार आहे का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रात कुठलं सरकारच अस्तित्वात नाही

महाराष्ट्रात सरकारच अस्तित्त्वात नाही. सरकार बेकायदेशीर आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून तेवढा आवाकाच नाही. तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला आहे. अशा त्रिकोणात हे राज्य सापडलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आधी अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने बरखास्त केलं पाहिजे

सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांनाच अपात्र ठरवलं पाहिजे. कारण विधानसभा अध्यक्षांच्या पदावर राहण्यासच ते अपात्र आहेत. राहुल नार्वेकर हे ज्या पद्धतीने चालढकल करत आहेत, ज्या पद्धतीने वेळकाढू करत आहेत. संविधान आणि घटना ते मानायला तयार नाहीत अशी व्यक्ती कुठल्याही पदावर राहता कामा नये असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आधी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना बरखास्त केलं पाहिजे आणि मग आमदारांना बरखास्त केलं पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.