राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिजारा विधानसभा क्षेत्रात सभा घेतली. बाबा बालक नाथ यांचा प्रचार योगी आदित्यनाथ करत आहेत. आपल्या भाषणात त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर कडाडून टीका केली. राजस्थानची जनता काँग्रेसला धडा शिकवेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत योगी आदित्यनाथ?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या भाषणात म्हणाले की, “उदयपूरच्या कन्हय्यालाल प्रकरण हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात राजस्थानचं सरकार अपयशी ठरलं. आमच्या अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यानेच हे मंदिराची निर्मिती सुरु झाली. आमच्या सरकारमध्ये भव्य राम मंदिर उभारलं जातं आहे. तसंच काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं. काँग्रेस सरकारला अयोध्या प्रश्न भिजत ठेवायचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधून ३७० चं कलम हटवून तिथला दहशतवाद संपवला आहे असंही योगी आदित्यनाथ आपल्या भाषणात म्हटलं आहे.

after controvrcial remark on rahul gandhi bonde said in sense my statement makes mother angry with child
नागपूर : राहुल गांधींवर टीका करणारे भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले ” माझे वक्तव्य आई मुलाला रागावते त्या अर्थाने “
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vanchit Bahujan aghadi agitation against senior literary figure in Nagpur
नागपुरातील ज्येष्ठ साहित्यिकाच्या विरोधात वंचितचे आंदोलन, निवासस्थानी पोलीस तैनात
Mohan Bhagwat, Chandrapur, RSS,
सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्याचा चंद्रपुरात जाहीर निषेध, आंदोलन
Royal Immersion Procession of Sangli Sansthan
सांगली संस्थानची शाही विसर्जन मिरवणूक; वाद्यांच्या गजरात गणेशाला निरोप
swami Govind dev giri maharaj comment on Chhatrapati Shivaji maharaj
Swami Govind Dev Giri: ‘छत्रपती शिवरायांनी त्याकाळी ईडीप्रमाणे सक्तीची वसुली केली’, स्वामी गोविंददेव गिरी यांचे विधान
Devendra Fadnavis Ask Question to Sharad pawar
Devendra Fadnavis : “आपल्या बापाला लुटारु म्हणणारे हे कोण लोक आहेत?”, सूरतच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
BJP MLA Dr. Sandeep Dhurve dance with famous dancer Gautami Patil video goes viral
Video : गौतमी पाटीलसोबत आमदार संदीप धुर्वे थिरकले; जिल्ह्यात पूरस्थिती अन्…

तालिबानचा फक्त एकच उपाय आहे बजरंगबलीची गदा

आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ म्हणाले, “तालिबानचा फक्त एकच उपाय आहे. बजरंगबलीची गदा. गाझामध्ये इस्रायल ज्याप्रमाणे तालिबानी मानसिकता चिरडण्याचं काम करतो आहे. तशाच पद्धतीने आपणही दहशतवादाविरोधात लढलं पाहिजे. एकदम निवडून अराजकता, गुंडगिरी, दहशतवाद हे संपवले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी समाजासाठी कलंक आहेत. त्या बजरंगबलीच्या गदेनेच संपवल्या पाहिजेत. गुंडगिरी आणि अराजकता यांच्याशी जेव्हा मतांचं राजकारण जोडलं जातं तेव्हा महिला, गरीब, व्यापारी, तसंच सगळा सभ्य समाज त्याच्या विळख्यात सापडतो.” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

राजस्थानात आज संतांच्या आश्रमांवर बुलडोझर चालवले जात आहेत. या ठिकाणी आया बहिणी सुरक्षित नाहीत. व्यापाऱ्यांची संपत्ती गुंड लुटून नेत आहेत. या सगळ्यातून तुम्हाला सुटायचं असेल बाबा बालकनाथ यांना निवडून द्या. भाजपाचं सरकार आणा म्हणजे या सगळ्या गोष्टी नियंत्रणात येतील असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.