माणिकराव ठाकरे , काँग्रेस प्रभारी-तेलंगण

तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारचा भ्रष्टाचार, घराणेशाही, खोटी आश्वासने याबद्दल सामान्य लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नाराजी होती. या नाराजीचा काँग्रेसला फायदा झाला आहे. स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती काँग्रेस पक्षामुळे झाली होती. त्याचे श्रेय अखेर काँग्रेसला मिळाले.

Prime Minister Narendra Modi assertion of support for developmental policy in Brunei
विकासात्मक धोरणाला पाठिंबा; ब्रुनेई येथील भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Man Khatav Constituency Prabhakar Deshmukh vs MLA Jayakumar Gore MArathi News
कारण राजकारण: विश्वासार्हता, आमदारकी टिकवण्याचे जयकुमार गोरे यांच्यापुढे आव्हान
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
eknath shinde and ajit pawar 4
स्वाक्षरीवरून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये धुसफूस
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर
Advice from Chief Minister Eknath Shinde on opposition criticism of Chief Minister Majhi Ladki Bahin scheme print politics news
योजनेवर टीका करणाऱ्या सत्ताधारी आमदारांना तंबी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कानउघाडणी
Ajit Pawar
Ladki Bahin Yojana : रवी राणांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या…”

चंद्रशेखर राव यांच्या सरकारबद्दल सर्वत्र नाराजीची भावना होती.  सरकारमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार होता. याचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. राव यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या राज्यकारभारावरील प्रभावाने तर हद्दच गाठली होती. स्वत: चंद्रशेखर राव मुख्यमंत्री, मुलगा मंत्री, भाचा मंत्री, मुलगी आमदार व अन्य नातेवाईकही महत्त्वाच्या पदांवर असे चित्र होते. पक्षाच्या मंत्र्यांनाही काहीही अधिकार नव्हते वा त्यांना स्वातंत्र्यही नव्हते.  चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या विविध योजनांची प्रसिद्धीच अधिक झाली. या योजनेचा सामान्य नागरिकांना लाभ मिळाला नव्हता. नुसती जाहीरातबाजी करून चालत नाही, हा संदेश तेलंगणच्या निकालातून स्पष्ट होतो. त्याचप्रमाणे लोकांना गृहित धरणाऱ्यांचा फुगा कसा फुटतो, हेही हा निकाल सांगतो.

हेही वाचा >>>शिवराजसिंह यांचा विजय कृषी-प्रगतीमुळे!

 ‘रयतु बंधू’ किंवा ‘दलित बंधू’ या योजनांची चंद्रशेखर राव यांनी जाहीरातच अधिक केली. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत नव्हता. शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत होती. शेतकऱ्यांचा तांदूळ खरेदी करण्याचे आश्वासन चंद्रशेखर राव देत होते ,पण तांदूळ खरेदी केला गेला नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत होती. एकूणच सरकारबद्दल सर्वत्र नाराजीची भावना दिसत होती. त्याचा मुख्यत्वे काँग्रेसला फायदा झाला.  काँग्रेसने प्रचारात चंद्रसेखर राव सरकारच्या गैरकारभारावर नेमके बोट ठेवले. सरकार सर्व आघाडय़ांवर कसे अपयशी ठरले आहे हे जनतेला दाखवून दिले. काँग्रेसने दिलेली पाच आश्वासने लोकांच्या पसंतीस उतरली. त्यातूनच जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे. कर्नाटकात काँग्रेसने दिलेल्या पाच आश्वासनांची मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत अंमलबजावणी करण्यात आली. त्याची आठवण पक्षाने मतदारांना करून दिली होती. लोकांमध्ये काँग्रेसबद्दल यातूनच विश्वासाची भावना निर्माण झाली. हे सारे घटक काँग्रेसला फायदेशीर ठरले.

स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी काँग्रेसचे योगदान मोठे होते. तत्कालीन यूपीए सरकारने स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीला हिरवा कंदिल दाखविला होता. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीचे अखेर काँग्रेस पक्षाला श्रेय मिळाले आहे.