भारताने २० व्या शतकामध्ये केलेल्या चुका २१ व्या शतकात सुधारल्या जात आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचं (एएमयू) नाव बदलून राजा महेंद्र प्रताप यांच्या नावाने ठेवण्याची मागणी भारतीय जनता पार्टीची मागणी असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी राजा महेंद्र प्रताप यांच्या नावाने एएमयूच्या बाजूलाच तयार होणाऱ्या नवीन विद्यापिठाचं भूमिपूजन केलं. तसेच मोदींनी अलिगढमध्ये उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडोअर आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या प्रस्तावित प्रतिकृतीचं अनावरणही केलं. यावेळी शस्त्रनिर्मितीसंदर्भात भाष्य करताना मोदींनी भारतामध्ये आज ग्रेनेडपासून युद्धनौकांपर्यंत सर्वकाही तयार केलं जात असल्याचं सांगितलं. यावेळी मोदींनी यापूर्वी उत्तर प्रदेश कसा होता आणि आता कसा आहे याबद्दल भाष्य केलं आहे. मोदींनी या भाषणामधून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा