पीटीआय, पुणे : आपल्या सैनिकांचे रक्षण करता येत नसेल, तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केंद्र सरकारवर तोफ डागली. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या दाव्याच्या संदर्भात पवारांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

येथील पुरंदर तालुक्यात एका शेतकरी मेळाव्याला पवारांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘देशात अनेक घटना घडत असल्या तरी त्यातील काही उजेडात येत नाहीत. पुलवामा भागात ४० सैनिक मारले गेले. भाजपनेच नेमलेले माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलिकडेच याबाबत नवी माहिती समोर आणली. त्यावेळी जवानांना योग्य साधनसामुद्री आणि विमाने न पुरविण्यात आल्यामुळे त्यांना आपला जीव गमावावा लागला. मलिक यांनी देशतील एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला याबाबत माहिती दिली, तेव्हा त्यांना याबाबत बोलू नका असे सांगण्यात आले.’’ 

BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Joe Biden praise on kamala harris
कमला हॅरिस इतिहास घडवतील! बायडेन यांच्याकडून विश्वास व्यक्त; लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन
Loksatta karan rajkaran Deputy Chief Minister Ajit Pawar refused to answer whether he would reunite with Sharad Pawar group
शरद पवारांशी हातमिळवणी बाबत अजित पवारांचे मौन
Kirit Somaiya probe ins vikrant
Kirit Somaiya: आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा किरीट सोमय्यांना धक्का; चौकशी आवश्यक असल्याचे दिले आदेश
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
Sanjay Raut : “उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणारे दिल्लीच्या अब्दालीचे लोक”, संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “मर्द असाल तर…”

जवानांचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असते. सरकार जर विपरित भूमिका घेत असेल, तर त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्यासाठी केवळ येऊ घातलेल्या निवडणुकाच महत्त्वाच्या असतात.

– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस