भाजपाच्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेतेमंडळींनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी ‘पप्पू’ या शब्दाचा अनेकदा वापर केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या शब्दावरून काँग्रेसकडूनही वारंवार भाजपावर टीकास्र सोडलं जातं. आता हा शब्द थेट देशाच्या संसदेमध्ये ऐकायला येऊ लागला असून तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी एका विषयावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये थेट मोदी सरकारलाच “आता पप्पू कोण आहे?” असा परखड सवाल केला आहे. देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकत्वाचा त्याग केलेल्या भारतीयांबाबत चर्चा सुरू असताना मोईत्रांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

“पुरवणी मागण्यांमुळे तिजोरीवर अतिरिक्त भार”

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, मोईत्रा यांनी मोदी सरकारवर टीका करताना अनेक मुद्द्यांवरून परखड सवाल केले. “लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये केंद्र सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ४.३६ लाख कोटींचा भार पडणार आहे. यामुळे देशाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि तुटीच्या रकमेपेक्षाही जास्त ही रक्कम होईल”, असं महुआ मोईत्रा लोकसभेत बोलताना म्हणाल्या.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
Republic Day 2025 Democracy Constitution Republican System
गणराज्यवादाचा अर्थ शोधताना…
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका
Vinayak Raut On Shinde Group Ajit Pawar Group
Vinayak Raut : “शिंदे गट आणि अजित पवार गटाला लवकरच…”, ठाकरे गटातील नेत्याच्या दाव्याने खळबळ

“परकीय गंगाजळीमध्ये ७२ बिलियन डॉलर्सची घट”

“एनएसओच्या आकडेवारीनुसार, औद्योगिक क्षेत्राचं उत्पादन ऑक्टोबर महिन्यात तब्बल ४ टक्क्यांनी घटलं आहे. गेल्या २६ महिन्यांतला हा नीचांकी आकडा आहे. इंडस्ट्रियल प्रोडक्शनच्या निर्देशांकात नोंद होणाऱ्या उत्पादन क्षेत्रासह इतर औद्योगिक क्षेत्रामध्येही नकारात्मक विकासदर नोंद झाला आहे. परकीय गंगाजळीमध्ये अवघ्या वर्षभरात तब्बल ७२ बिलियन डॉलर्सने घट झाली आहे”, असं मोईत्रा लोकसभेतील आपल्या भाषणात म्हणाल्या.

नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांचं काय?

दरम्यान, यावेळी बोलताना मोईत्रा यांनी नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांच्या संख्येवरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. यासाठी त्यांनी केंद्र सरकारनेच दिलेली आकडेवारी प्रमाण मानून त्यावरून सरकारला परखड सवाल केले. “मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षांच्या काळात जवळपास १२.५ लाख भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला आहे. हे सक्षम अर्थव्यवस्था आणि कररचनेचं लक्षण आहे का? आता पप्पू कोण आहे?” असा सवाल मोईत्रा यांनी यावेळी केला.

Story img Loader