चांद्रयान ३ च्या यशस्वीतेनंतर भारत आता अंतराळात अंतराळवीर पाठवण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान, आपण अंतराळात लवकरच अंतराळवीर पाठवणार आहोत, असं इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत म्हणाले आहेत. यादरम्यान, त्यांनी अंतराळ कार्यक्रमासाठी भारताची महत्त्वाकांक्षी दृष्टी अधोरेखित केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नेहमीच अंतराळ प्रयत्नांसाठी मदत करतात. ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचं सहकार्य लाभलं आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या या परिषदेत बोलताना त्यांनी २०३५ पर्यंत अंतराळात भारतीय अंतराळ स्थानक उभारण्याचे उद्दिष्टही अधोरेखित केले.

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यावेळी म्हणाले, “चांद्रयान ३ चे यश आणि इस्रोचे मागील सहा महिन्यांतील सर्व प्रयत्न लक्षात घेऊन, पंतप्रधान मोदींनी आमच्यासाठी एक विशेष योजना तयार केली आहे. इस्रोच्या सध्याच्या प्रकल्पात यश मिळवण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

centre likely to approve gst exemption on senior citizen health insurance premiums
आरोग्यविम्यावरील जीएसटीत सवलत; मंत्रिगटाचा प्रस्ताव; अंतिम निर्णय परिषद घेणार
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
in mumbai mhada konkan mandal huge response for houses under first priority scheme
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ‘प्रथम प्राधान्य’योजनेअंतर्गत २० टक्क्यांतील घरांना प्रचंड प्रतिसाद, ६६१ पैकी ४५३ घरांच्या विक्रीची शक्यता
CCTV cameras Thane to Badlapur, CCTV cameras Thane,
ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरांमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे
SpaceX succeeds in bringing the rocket back to the launch site
विश्लेषण : रॉकेट उडाले.. फिरुनी परतले.. स्थिरावले प्रक्षेपणस्थळी! स्पेसएक्स स्टारशिपच्या अद्भुत पाचव्या चाचणीची चर्चा जगभर का?
Decision from Wipro on Thursday on reward shares
बक्षीस समभागावर विप्रोकडून गुरुवारी निर्णय
Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
Cement concreting roads Mumbai, IIT, roads Mumbai,
मुंबई : रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाला सुरुवात, आयआयटीची गुणवत्ता तपासणीही सुरू

एस सोमनाथ पुढे म्हणाले, इस्रोचे उद्दिष्ट केवळ गगनयान मोहीम राबविणे नाही तर अंतराळात मानवी कार्य प्रस्थापित करणे देखील आहे, जेणेकरून २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवू शकेल. २०४० पर्यंतचा हा कालावधी फार मोठा वाटत असला तरीही तो प्रत्यक्षात फार मोठा नाही. २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक तयार करण्याचे आपले उद्दिष्ट्ये आहे. यामुळे, भारतीयांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षण परिस्थितीत संशोधन करण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करेल.

यावर्षी गगनयानाची चाचणी

भारतीय अंतराळ संस्था गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. २०२५ पर्यंत या गगनयानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे, त्यासाठी २०२४ मध्ये प्रक्षेपणाची चाचणी घेण्यात येणार आहे.