Actor Chiranjeevi on Gender Remark : हैदराबाद येथे चित्रपट कार्यक्रमादरम्यान केलेल्या लिंगभेदाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेता चिरंजीवी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी आता नातवाची आवश्यता असल्याचं ते म्हणाला. त्यांचं हे वक्तव्य लिंगभेदी असल्याची टीका राजकीय क्षेत्रातून होऊ लागली आहे.

ब्रह्मा आनंदमच्या प्रदर्शनापूर्वी कार्यक्रमात बोलताना चिरंजीवी म्हणाले, जेव्हा मी घरी असतो तेव्हा मला असं वाटतं की माझ्या नातवंडांमध्ये नसून महिलांच्या वसतिगृहात आहे. त्यांचा मी वॉर्डन असल्यासारखं मला वाटतं. संपूर्ण घर महिलांनी वेढलेलं असतं. मी किमान यावेळी तरी राम चरणला मुलगा व्हावा अशी आशा करतो. जेणेकरून आमचा वारसा पुढे चालू राहील. मला भीती वाटते की त्याला पुन्हा मुलगी होईल. पण त्याला सुंदर मुली आहेत.

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”

चिरंजीवी यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र संपात व्यक्त केला जातोय. राजकारणी आणि कार्यकर्त्यांनी पितृसत्ताक संस्कृतीला यामुळे बळकटी मिळत असल्याचं म्हटलं जातंय. काँग्रेस खासदार माथेर यांनी या विधानावर टीका करताना म्हटलं की, हे खूप दुःखद आहे. हे एक अतिशय दुर्दैवी विधान आहे की फक्त एक मुलगाच हा वारसा पुढे नेऊ शकत. मुले आणि मुली दोघेही आपली संपत्ती आहेत. आम्हाला दोघांचा अभिमान आहे. आपण खरोखरच त्यांच्याकडून चांगले वर्तन करणारे व्यक्ती असावे अशी अपेक्षा केली पाहिजे जे समाजासाठी चांगलं काम करतात.”

Story img Loader