देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल आकारणी कायमची बंद करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याकडून यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, तो लवकरच मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
या प्रस्तावानुसार राष्ट्रीय महामार्गावर खासगी चारचाकी वाहनांवरील टोल आकारणी रद्द करण्यात येणार आहे. त्याऐवजी वाहनधारकांकडून एकरकमी टोलची आकारणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, टोलचे हे नुकसान भरून काढण्यासाठी काही पर्यायी मार्ग अवलंबले जाणार आहेत. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटरमागे १ टक्का सेसची आकारणी करणे आणि नवीन वाहन खरेदी करताना दोन टक्के अधिभार लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. याशिवाय सध्या ज्यांच्याकडे वाहने आहेत, अशांकडून टोलची रक्कम एकाचवेळी आगाऊ वसूल करण्यात येणार आहे. या उपाययोजनांमुळे टोलनाक्यांवर वाहने थांबल्यामुळे इंधनाचा होणारा अपव्यय टाळता येईल. तसेच टोलची रक्कम ही थेटपणे सरकारी तिजोरीत जमा होईल. या नव्या प्रस्तावाची अंमलबजावणी केल्यास टोलवसुलीच्या माध्यमातून सध्या गोळा होत असलेली २६ हजार कोटींची रक्कम ३२ हजार कोटींपर्यंत जाऊ शकते, असे केंद्रीय वाहतूक खात्याचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द ?
देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल आकारणी कायमची बंद करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-12-2014 at 10:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toll system going to withdraw from national highways in india