सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ‘आयईडी’चा वापर करून रविवारी एक ट्रक उडवून दिला. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ‘कोब्रा’ शाखेचे दोन जवान शहीद झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. सिल्गर आणि टेकलगुडेम छावण्यांच्यादरम्यान तिम्मनपुरम गावाजवळ दुपारी तीनच्या सुमाराला हा स्फोट घडवण्यात आला.

हेही वाचा >>> ‘नीट’चा तपास सीबीआयकडे; अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल

first session of 18th lok sabha may turn out to be stormy affair
वादळी चर्चेची चिन्हे; १८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून, विरोधकांचे संख्याबळ वाढल्याने सरकारची परीक्षा
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
chinese telecom equipment used by pakistani terrorists
पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे चीनची दूरसंचार उपकरणे
Neet Exam
NEET Paper Leak : आरोपींकडे सापडलेल्या जळालेल्या प्रश्नपत्रिकेतून अनेक खुलासे, तब्बल ६८ जुळणारे प्रश्न अन्…
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
create 50 large ponds in northeast to manage brahmaputra floods says amit shah
पूरनियंत्रणासाठी ईशान्येत तलाव उभारा; अमित शहा यांच्या सूचना; ‘इस्रो’च्या माहितीचा वापर करण्याचे आदेश
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

‘कोब्रा’चे जवान मोटारसायकलींवरून जागरगुंडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सिल्गर छावणीपासून टेकलगुडेमच्या दिशेने गस्त घालत होते. ट्रकमध्ये त्यांचे सामान होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी ट्रकला लक्ष्य केले. स्फोटात हवालदार शैलेंद्र आणि ट्रकचालक विष्णू मारले गेले. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी आणखी कुमक पाठवण्यात आली. जवानांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शोधमोहीम सुरू करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही असे सांगितले. ‘‘बस्तर भागात नक्षलवादी मोहीम सुरू असल्यामुळे नक्षलवादी वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि नैराश्यातून अशा प्रकारची भ्याड कृत्ये करत आहेत. जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही. नक्षलवादाचे निर्मूलन झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही’’, असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले.