सीएए कायदा काहीही झालं तरीही मागे घेतला जाणार नाही. हा कायदा कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व देण्यासाठी केलेला कायदा आहे. मोदी सरकारची गॅरंटी ही आहे की हे सरकार जे वचन देतं ते पाळतं. त्यामुळे मी हे ठामपणे सांगतो आहे की कुठल्याही परिस्थितीत हा कायदा मागे घेतला जाणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही टीका केली आहे.

काय म्हटलं आहे अमित शाह यांनी ?

उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुमचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही हा कायदा आणला आहे. याबाबत विचारलं असता अमित शाह म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो, तुम्हाला हा कायदा हवा की नको हे स्पष्ट करा. उद्धव ठाकरे हे सांगू इच्छितात की कायदा नको? देशाच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेपुढे हे मी आव्हान देतो की त्यांनी हे स्पष्ट करावं की हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा यायला नको. उद्धव ठाकरेंनी हे सांगावं. राजकारण करु नका, मी थेट उद्धव ठाकरेंना विचारतो आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा. “

Sharad Pawar statement that Sitaram Yechury contribution is important in the stability of the United Progressive Alliance government
‘संपुआ’ सरकारच्या स्थिरतेत येचुरींचे योगदान महत्त्वाचे; शरद पवार यांच्याकडून आठवणींना उजाळा
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
parli assembly constituency marathi news
धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘आघाडी’
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “राहुल गांधी यांच्या जिवाला धोका आहे, त्यांच्यावर हल्ला…”, संजय राऊत यांचा आरोप
What Ravneet Bittu Said About Rahul Gandhi?
Rahul Gandhi : “राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी, त्यांच्यावर बक्षीस..” केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांचं वक्तव्य
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
bajrang punia replied to brij bhushan singh
“विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा करणारे…”; बृजभूषण शरण सिंह यांच्या ‘त्या’ टीकेला बजरंग पुनियांचे जोरदार प्रत्युत्तर!

हे पण वाचा- “उद्धव ठाकरेंना माझं खुलं आव्हान आहे, त्यांनी महाराष्ट्राला सांगावं…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आक्रमक

उद्धव ठाकरे मुस्लिमांचं लांगुलचालन करत आहेत

“उद्धव ठाकरे मुस्लिमांचं लांगुलचालन करत आहेत. मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे सगळं करत आहेत. सध्याच्या घडीला मतं मिळवण्यासाठी हे सगळं चाललं आहे. आमची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की देशाची फाळणी झाल्यानंतर जे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे. ” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

नागरिकत्व कायदा हिरावण्याचा हा कायदा नाही

“सीएए कायद्यात विविध तरतुदी आहेत. सहाव्या सूचीत जी क्षेत्रं आहेत तिथे सीएए लागू होणार नाही. कुणी तिथून अर्ज केला तरीही तिथून ते स्वीकारलं जाणार नाही. सीएए कायदा हा भारताचं नागरिकत्व देणारा कायदा आहे. कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्याचा हा कायदा नाही. केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांना कायदा नाकारण्याचा अधिकार नाही. कारण संसदेचा तो अधिकार आहे. हा विषय केंद्राचा आहे. केंद्र आणि राज्यांचा विषय नाही.” असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.