मुंबई : माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामीच्या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी विशेष न्यायालयात धाव घेतली. ठाकरे आणि राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला होता. तसेच, त्यांना समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ठाकरे आणि राऊत यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली आहे व महादंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा >>> कुवेतमध्ये अग्नितांडव; ४२ भारतीयांचा मृत्यू ; मजुरांची वस्ती असलेल्या इमारतीत आग

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
amol kirtikar from mumbai alleges election manipulation files complaint with cec
मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची कीर्तिकर यांची तक्रार; ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

बदनामी करणारा कथित लेख एका महिला पत्रकाराने घेतलेल्या मुलाखतीवर आधारित होता आणि इतर वृत्तपत्रांसह समाजमाध्यमावरूनही तो प्रसिद्ध झाला होता. मात्र, शेवाळे यांनी निवडकपणे आपले वृत्तपत्र आणि आपल्याला लक्ष्य केल्याचा दावा ठाकरे आणि राऊत यांनी अर्जात केला आहे. स्वतंत्र आणि सशक्त माध्यमांचे अस्तित्व हा लोकशाहीचा पाया आहे. राजकीय व्यक्तीची मुलाखत, देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाबाबतची त्यांची मते तसेच कोणाही विरोधात मते प्रकाशित करणे हे माध्यमांचे कर्तव्य असल्याचेही अर्जात म्हटले आहे. त्यामुळे आपल्याविरोधातील तक्रार तथ्यहीन, खोटी आणि बनावट आहे. समन्स बजावण्यात न्यायदंडाधिकाऱ्यांची चूक झाली असून समन्स रद्द न केल्यास आपले कधीही भरून न येणारे नुकसान होईल आणि हे एकप्रकारे न्यायाचा गळा घोटण्यासारखे असल्याचा दावाही ठाकरे आणि राऊत यांनी केला आहे.