केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठीच्या व्याज अनुदान योजनेला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना केवळ चार टक्के दराने पीककर्ज मिळणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठीचा व्याजदर ९ टक्के इतका होता. मात्र, आता यापैकी पाच टक्के व्याजाची रक्कम सरकार भरणार असल्याने शेतकऱ्यांना केवळ चार टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध होईल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, व्याजदरातील या अनुदानासाठी सरकारकडून काही निकष आखून देण्यात आले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी घेतलेल्या तीन लाख रूपयापर्यंतच्याच कर्जासाठी चार टक्क्यांचा व्याजदर लागू असेल. तसेच शेतकऱ्यांना या कर्जाची परतफेड एका वर्षाच्या आत करावी लागेल. पीक कर्जाच्या व्याजावरील अनुदानासाठी केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षात २०,३३९ कोटी रुपये खर्च करणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा