उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी (१७ सप्टेंबर) रात्री गोरखपूरच्या मानसरोवर येथील रामलीला मैदानात आयोजित एका शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी ३४३ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच अनेक विकासकामांचं उद्घाटनही केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी राज्याचा विकास, लोककल्याण, कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य केलं. यावर बोलताना आदित्यनाथ म्हणाले कायदा हा आपल्या संरक्षणासाठी आहे. परंतु कायदा हाताशी धरून कोणी आपल्या व्यवस्थेशी खेळ केला तर त्याची गाठ आमच्या सरकारशी आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले, आपल्या सुरक्षेसाठी कायदा आहे. परंतु, कोणी जर आया-बहिणींचा विनयभंग केला तर पुढच्या चौकात यमराज त्याची वाट बघत असेल. त्याला यमराजाकडे पाठवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. आपल्याला या राज्यातील जनतेला उत्तम सुरक्षा प्रदान करायची आहे. कायदा हा आपल्या संरक्षणासाठी आहे. परंतु, याच कायद्याला हाताशी धरून कोणीही कोणाच्याही सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रयत्न करू नये.

Agitating doctors seek President PM Modi intervention
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा! पश्चिम बंगालमधील आंदोलक डॉक्टरांचे पत्र
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Narendra Modi Wardha tour Union Ministry of Micro and Small Scale Vishwakarma Yojana Programme
आमचे काय ? पंतप्रधानांचा दौरा आणि भाजप नेत्यांना पडला पेच, जिल्हाधिकाऱी म्हणतात हा तर…
Girish Mahajan, High Court, Girish Mahajan news,
मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram join sharad pawar NCP
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
women s safety top national priority pm modi at lakhpati didi sammelan
महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही
Yavatmal, Badlapur incident, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, women's safety, Shakti Act, severe punishment, public sentiment, Maharashtra politics
बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, आपलं सरकार कोणताही भेदभाव न करता विकासकामं, लोककल्याणकारी योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहे. शासन त्यांचं काम चोख बजावत आहे, तर नागरिकही त्यांचं कर्तव्य बजावताना दिसतात. त्यामुळे विकासकामात अडथळे निर्माण करणारे आपोआपो उघडे पडत आहेत. विकास प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचं कामही आपण करत आहोत.

हे ही वाचा >> “…तर ‘शिवसेना’ शिंदे गटाला देण्याचा निर्णय रद्द होईल”, घटनातज्ज्ञांनी मांडलं गणित; वाचा सविस्तर

योगी आदित्यनाथ म्हणाले, विकासकामांना आपलं सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे. विकासकामं करताना, वेगवेगळ्या योजना राबवताना कोणत्याही स्तरावर दुर्लक्ष होता कामा नये, याची काळजी सरकार घेत आहे. यात कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. राज्यातली विकासकामं ही दर्जेदारच असली पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे.