उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी (१७ सप्टेंबर) रात्री गोरखपूरच्या मानसरोवर येथील रामलीला मैदानात आयोजित एका शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी ३४३ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच अनेक विकासकामांचं उद्घाटनही केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी राज्याचा विकास, लोककल्याण, कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य केलं. यावर बोलताना आदित्यनाथ म्हणाले कायदा हा आपल्या संरक्षणासाठी आहे. परंतु कायदा हाताशी धरून कोणी आपल्या व्यवस्थेशी खेळ केला तर त्याची गाठ आमच्या सरकारशी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगी आदित्यनाथ म्हणाले, आपल्या सुरक्षेसाठी कायदा आहे. परंतु, कोणी जर आया-बहिणींचा विनयभंग केला तर पुढच्या चौकात यमराज त्याची वाट बघत असेल. त्याला यमराजाकडे पाठवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. आपल्याला या राज्यातील जनतेला उत्तम सुरक्षा प्रदान करायची आहे. कायदा हा आपल्या संरक्षणासाठी आहे. परंतु, याच कायद्याला हाताशी धरून कोणीही कोणाच्याही सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रयत्न करू नये.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, आपलं सरकार कोणताही भेदभाव न करता विकासकामं, लोककल्याणकारी योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहे. शासन त्यांचं काम चोख बजावत आहे, तर नागरिकही त्यांचं कर्तव्य बजावताना दिसतात. त्यामुळे विकासकामात अडथळे निर्माण करणारे आपोआपो उघडे पडत आहेत. विकास प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचं कामही आपण करत आहोत.

हे ही वाचा >> “…तर ‘शिवसेना’ शिंदे गटाला देण्याचा निर्णय रद्द होईल”, घटनातज्ज्ञांनी मांडलं गणित; वाचा सविस्तर

योगी आदित्यनाथ म्हणाले, विकासकामांना आपलं सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे. विकासकामं करताना, वेगवेगळ्या योजना राबवताना कोणत्याही स्तरावर दुर्लक्ष होता कामा नये, याची काळजी सरकार घेत आहे. यात कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. राज्यातली विकासकामं ही दर्जेदारच असली पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले, आपल्या सुरक्षेसाठी कायदा आहे. परंतु, कोणी जर आया-बहिणींचा विनयभंग केला तर पुढच्या चौकात यमराज त्याची वाट बघत असेल. त्याला यमराजाकडे पाठवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. आपल्याला या राज्यातील जनतेला उत्तम सुरक्षा प्रदान करायची आहे. कायदा हा आपल्या संरक्षणासाठी आहे. परंतु, याच कायद्याला हाताशी धरून कोणीही कोणाच्याही सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रयत्न करू नये.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, आपलं सरकार कोणताही भेदभाव न करता विकासकामं, लोककल्याणकारी योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहे. शासन त्यांचं काम चोख बजावत आहे, तर नागरिकही त्यांचं कर्तव्य बजावताना दिसतात. त्यामुळे विकासकामात अडथळे निर्माण करणारे आपोआपो उघडे पडत आहेत. विकास प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचं कामही आपण करत आहोत.

हे ही वाचा >> “…तर ‘शिवसेना’ शिंदे गटाला देण्याचा निर्णय रद्द होईल”, घटनातज्ज्ञांनी मांडलं गणित; वाचा सविस्तर

योगी आदित्यनाथ म्हणाले, विकासकामांना आपलं सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे. विकासकामं करताना, वेगवेगळ्या योजना राबवताना कोणत्याही स्तरावर दुर्लक्ष होता कामा नये, याची काळजी सरकार घेत आहे. यात कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. राज्यातली विकासकामं ही दर्जेदारच असली पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे.