नवी दिल्ली : अमेरिकेच्या ‘यूएस कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम’ (यूएससीआयआरएफ) या महत्त्वाच्या संस्थेने भारताला ‘विशेष चिंतेचा देश’ (सीपीसी) म्हणून घोषित करावे अशी शिफारस अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला केली आहे. यूएससीआयआरएफने नुकताच यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये भारतात धार्मिक अधिकारांवर गदा येत असल्याचे ताशेरे ओढले आहेत.

भारतातील धार्मिक स्वातंत्र्यांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या सरकारी संस्था आणि अधिकाऱ्यांची मालमत्ता गोठवून त्यांच्यावर लक्ष्यित निर्बंध लादण्याची विनंती यूएससीआयआरएफने बायडेन सरकारला केली आहे. तसेच भारत-अमेरिका द्विपक्षीय बैठकांदरम्यान धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला जावा आणि त्यावर चर्चा व्हावी अशी शिफारस अमेरिकी कायदे मंडळाकडे म्हणजेच काँग्रेसकडे करण्यात आली आहे.

supreme court says secularism a core part of constitution
धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचा भाग! प्रास्ताविकेत शब्दांच्या समावेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Consumer Protection Act 2019, defects in goods and services., Consumer Protection, Consumer Protection news,
ग्राहक राजा सतर्क हो…!
The Supreme Court held that Section 6A of the Citizenship Act is constitutionally valid
स्थलांतरितांचे नागरिकत्व सर्वोच्च न्यायालयात वैध; आसामबाबत कायद्यातील तरतुदीवर शिक्कामोर्तब
Loksatta explained What difference will the verdict on Bangladeshis in Assam make print exp
विश्लेषण: आसाममधील बांगलादेशींबाबतच्या निकालाने काय फरक पडणार?
gurpatwant singh pannun
गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण : अमेरिकेच्या आरोपपत्रातील ‘तो’ आरोपी आता सरकारचा कर्मचारी नाही, भारताचे स्पष्टीकरण!
‘गतिशक्ती’ परिवर्तनशील उपक्रम; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, पायाभूत सुविधांमध्ये क्रांतीचा उद्देश
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : काश्मीरला गरज सकारात्मक राजकारणाची

या अहवालात असा आरोप केला आहे की, २०२२ मध्ये भारतातील धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती अधिक बिघडली आहे. संपूर्ण वर्षभरात राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावर भारत सरकारने धार्मिकदृष्टय़ा भेदभाव करणाऱ्या धोरणांना प्रोत्साहन देऊन ती राबवली आहेत. त्यामध्ये धर्मातर, आंतरधर्मीय नातेसंबंध, हिजाब परिधान करणे आणि गोहत्या या विषयांशी संबंधित कायद्यांचा समावेश आहे. या सर्वाचा मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, दलित आणि आदिवासी यांच्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

तथ्यहीन आरोप, भारताची टीका

यूएससीआयआरएफ भारताविषयीची तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडत असल्याची टीका भारताने केली आहे. तसेच यूएससीआयआरएफ ही संस्था विशेष हेतूने काम करत असल्याचा आरोपही भारताने केला आहे. त्यांच्या अशा कृत्यांमुळे यूएससीआयआरएफच्या विश्वसनीयता आणि वस्तुनिष्ठतेविषयीच्या शंका बळकट होत असल्याचे भारताने म्हटले आहे.