उत्तराखंडातील खराब हवामानाचा मदत व बचावकार्यास जबरदस्त तडाखा बसला असून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. या परिस्थितीत चिखलमाती हटविण्याच्या कामात अडथळे येत आहेत. याखेरीज २००हून अधिक पीडित गावांमधील बेघर झालेल्या लोकांना अन्नधान्याच्या मोठय़ा टंचाईचा सामना करावा लागत आहे.
मदतकार्यासाठी २००हून अधिक जणांचा समावेश असलेले तज्ज्ञांचे एक पथक चिखलमाती तसेच अन्य ढिगारे उपसण्याच्या कामी लागले असून मृतदेहांचाही त्यांनी शोध घेतला आहे. मात्र गेल्या आठवडय़ापासून केवळ ५९ मृतदेहांवरच मंदिराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. याखेरीज, गौरीमुख आणि जंगलचाट्टी येथे २३ मृतदेहांवर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मध्यंतरीच्या खराब हवामानामुळे या कामात मोठा खंड पडला होता, असे पोलीस उपमहासंचालकअमित सिन्हा यांनी सांगितले. केदारघाटी येथे शुक्रवारी सकाळपासून पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर पाऊस सुरू झाल्यामुळे बचावकार्यार्थ फारसे काही करता आले नाही.
यामुळे २४० गावांमधील लोकांना रसद पुरविण्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. रुद्रप्रज्ञा, उत्तरकाशी, चामोली आणि पिठोरगड जिल्ह्य़ांमधील मुख्य रस्ते अजूनही मोठय़ा प्रमाणावर उद्ध्वस्त झाल्यामुळेही मदतकार्यात अडथळे येत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2013 रोजी प्रकाशित
उत्तराखंडातील खराब हवामानाचा मदतकार्यात मोठा अडथळा
उत्तराखंडातील खराब हवामानाचा मदत व बचावकार्यास जबरदस्त तडाखा बसला असून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. या परिस्थितीत चिखलमाती हटविण्याच्या कामात अडथळे येत आहेत. याखेरीज २००हून अधिक पीडित गावांमधील बेघर झालेल्या लोकांना अन्नधान्याच्या मोठय़ा टंचाईचा सामना करावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-07-2013 at 02:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand bad weather hampers cremation of bodies in kedarnath