राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड चांगलेच चिडले आहेत. विदेशात जाऊन आपल्या देशावर टीका करणं हे साफ चुकीचं आहे. तसंच भारताच्या संसदेत माईक बंद केला जातो हे राहुल गांधी यांचं म्हणणं गैर आहे. भारताकडे G 20 चं अध्यक्षपद आहे. भारतासाठी हा गौरवशाली क्षण आहे अशावेळी भारतातला एक खासदार विदेशात जाऊन भारतावर टीका करत असेल, देशाचा अपमान करत असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही. उपराष्ट्रपतींनी राहुल गांधींचं नाव घेतलं नाही मात्र त्यांचा रोख राहुल गांधींकडेच होता.

जगदीप धनखड हे वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कर्ण सिंह मुंडक यांच्या उपनिषदावर आधारीत पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्या कार्यक्रमात राहुल गांधींचं नाव न घेता उपराष्ट्रपतींनी टीका केली आहे. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती म्हणाले की भारताच्या लोकसभेत माईक बंद केला जातो हे इथल्या खासदारने विदेशात जाऊन म्हणणं हा देशाचा अपमान आहे.

farmer leader raju shetty slam bjp over corruption issues in buldhana
राजू शेट्टी म्हणाले; महाराष्ट्र भाजपला आंदण दिलेला नाही; काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…या शेतकरी नेत्याने थेटच….
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
jaishankar, Jaishankar khata khat,
S Jaishankar : “आयुष्य हे खटाखट म्हणण्याइतकं सोप्पं नाही, इथे…”; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा राहुल गांधींना टोला!
bjp mp sambit patra criticized rahul gandhi over statement in america
राहुल गांधींवर देशद्रोहाचा आरोप; अमेरिकेतील वक्तव्यावरून भाजप आक्रमक
giriraj Singh Rahul gandhi
“देशद्रोह्यांना आरएसएसची विचारधारा कधीच समजणार नाही”, राहुल गांधींच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर!
Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar X
Mahyuti Disruption : तानाजी सावंतांपाठोपाठ भाजपा नेत्याची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, “त्यांच्यामुळे आमचं वाटोळं…”, महायुतीत धुसफूस चालूच
readers feedback on loksatta editorial
लोकमानस: राष्ट्रपतींचे भाष्य लक्षणीयच, पण…
president Draupadi Murmu, crimes against women, Kolkata doctor rape-murder, Alka Lamba, Congress criticism, Manipur violence, women’s empowerment,
माफ करा… राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूजी…काँग्रेसच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष असे का म्हणाल्या ?…

राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तसंच नरेंद्र मोदी हे एक विशिष्ट अजेंडा चालवत आहेत आणि त्याकडे देशाला घेऊन जात आहेत असाही आरोप केला होता. त्यानंतर भाजपानेही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तरीही राहुल गांधी यांनी हे बोलणं थांबवलं नव्हतं. या वक्तव्याच्या दुसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांनी देशाविषयी वक्तव्य केलं होतं. आता उपराष्ट्रपतींनी नाव न घेता राहुल गांधींना खडे बोल सुनावले आहेत.

आणखी काय म्हणाले आहेत उपराष्ट्रपती?

सध्या आपला देश अमृत काळात आहे. सगळे भारतीय यामुळे आनंदात आहेत. आपण अशा काळात असताना देशातला एक खासदार देशाच्या विरोधात बोलतो तेदेखील बाहेरच्या देशात जाऊन. हे कितीतरी दुःखद आणि दुर्दैवी आहे. समृद्ध लोकशाही मूल्यांचं हे हनन आहे असंही उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.