नवी दिल्ली : औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यामुळे औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल माझ्यामुळे थांबली, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. गेल्या आठवडय़ात खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन प्रकाश आंबेडकर यांनी फुले वाहिली होती. त्यानंतर भाजप व शिवसेना-शिंदे गटाने आंबेडकरांवर तीव्र टीका केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रकाश आंबेडकर यांनी अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणीही भाजपने केली होती. या वादावर सोमवारी पडदा टाकत आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये होणारी दंगल माझ्यामुळे थांबल्याचा दावा केला. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये नसली तरी त्यांनी शिवसेना-ठाकरे गटाशी युती केली आहे.

labor suicide contractor torture
ठेकेदाराच्या त्रासामुळे कामगाराची चाकूने गळा चिरून आत्महत्या, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठेकेदार अटकेत
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
man Committed to suicide after getting tired of being harassed by mother-in-law and wife
सासू, पत्नीसह चौघांच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
death of youth, procession, Vadgaon Sheri, Pune,
पुणे : मिरवणुकीत तरुणांच्या मृत्यू प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा, वडगाव शेरीतील दुर्घटना
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
Counter movement by OBC leaders opposing Manoj Jarange agitation for Maratha reservation demand
आंतरवलीजवळ आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे तणाव; आंदोलनप्रतिआंदोलनाने वाद

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त? एकमेव आमदार अण्णा बनसोडेही शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात

छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे फितूर आणि त्यांच्या हत्येचा सल्ला देणारे हे दोघे हिंदू होते, त्यांचा निषेध केला जात नाही. मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने खरा इतिहास पुढे आणला गेला. प्राध्यापक जैमिनी कडू यांनी लिहिलेल्या पुस्तकातील तपशील वाचला तर वास्तव कळेल. इथल्या जयचंदांनीच या देशाला गुलाम केले. इतिहास जसाच्या तसा स्वीकारला पाहिजे, कुठल्या तरी पक्षाला भूमिका सोयीची वाटते म्हणून इतिहासाचा गैरवापर करू नये, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.