Taj Mahal Leakage: दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आग्रा येते मागच्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्यामुळे जागतिक वारसा स्थळातील पर्यटन स्थळ असलेल्या ताजमहाल परिसरात पाणीच पाणी झाले आहे. ताजमहालच्या तीन घुमटांपैकी मुख्य घुमटातून पाण्याची गळती सुरू झाल्याचे भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गुरूवारी ताजमहाल परिसरातील उद्यानात पाणी साचल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर पर्यटकांचे लक्ष ताजमहालन पुन्हा वेधून घेतले. भारतीय पुरातत्व विभाग, आग्रा येथील अधिकाऱ्यांनी सांगिते की, मुसळधार पावसामुळे मुख्य घुमटातून गळती सुरू झाली असली तरी अद्याप ताजमहालचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

आग्रा विभागाच्या पुरातत्व खात्यामधील अधीक्षक प्रमुख राजकुमार पाटील यांनी पीटीआयशी सांगितले, “ताजमहालमध्ये पाण्याची गळती होत असल्याची बातमी खरी आहे. आम्ही मुख्य घुमटाची तपासणी केली असून पावसामुळे ही गळती होत असल्याचे दिसून आले. तसेच ड्रोन कॅमेऱ्याने आम्ही घुमटाची तपासणी केली आहे.” गुरुवारी ताजमहाल परिसरात पाणी साचल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर अनेकजण याठिकाणी व्हिडीओ काढण्यासाठी येऊ लागले.

पुणे: शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांची होणार स्वच्छता, हे आहे कारण !
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
What is the water storage in the Khadwasla dam chain Pune news
खडवासला धरण साखळीत पाणीसाठा किती? पुण्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार?
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?

हे वाचा >> ताजमहाल पूर्वी शिवमंदिर होते काय?

आग्रा येथील स्थानिक आणि सरकारमान्य गाईड असलेल्या मोनिका शर्मा यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, ताजमहाल आग्रा आणि संपूर्ण देशाचा अभिमान आहे. ताजमहालमुळे आग्र्यातील हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. सरकारने ताजमहालची विशेष काळजी घेतली पाहीजे. कारण येथील लोकांसाठी आणि पर्यटनासाठी ताजमहालचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

हे ही वाचा >> इंग्रज ताजमहाल चोरून नेणार होते? इतिहासातील पुरावे काय सांगतात?

आग्रा येथे तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागात पाणी साचले आहे. पावसामुळे येथील एक राष्ट्रीय महामार्ग जलमय झाला आहे, काही भागातील शेतात तळे साचले असून पिके वाया गेली आहेत तर शहरात महाग घरे असलेल्या भागातही पाणी साचले आहे.

Story img Loader