भारत पाकिस्तानातील दहशतवाद्यांना घुसून मारतं, असा आरोप केला जातोय. या आरोपांवर अमेरिकेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानमधील होत असलेल्या हत्यांमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप करणाऱ्या अहवालाचं निरिक्षण अमेरिकेकडून केलं जात असलं तरी या अहवालावर बोलण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले, पाकिस्तानातील हत्येत भारताचा सहभाग असलेल्या आरोपांच्या अहवालावर आमचं निरिक्षण सुरू आहे. परंतु, मूळ आरोपांवर आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही. तसंच, या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाणार नसलो तरी हा वाद वाढू नये म्हणून मध्यस्तीकरता संवादाद्वारे तोडगा काढण्याचे आम्ही त्यांना आवाहन करत आहोत.

Pervez Musharraf land acqasition
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मुशर्रफ यांच्या भारतातील वडिलोपार्जित जमिनीचा लिलाव; शत्रू संपत्ती कायदा काय आहे?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Pooja Khedkar in delhi high court
Pooja Khedkar : “मी AIIMS मध्ये जाण्यास तयार”, बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकर यांची दिल्ली उच्चन्यायालयात विनंती!
Loksatta anvyarth Discussion between Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden on Bangladesh issue
अन्वयार्थ: गोंधळ, गोंधळी यांना थारा नकोच!
India Nuclear powered Ballistic Missile Submarine SSBN INS Arighat
‘आयएनएस अरिघात’चा चीनला धसका का?
Australia’s new cap on number of international students
कॅनडापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही विद्यार्थ्यांना मोठा धक्का, नवे निर्बंध लागू; भारतीयांवर काय परिणाम होणार?
pm narendra modi speaks to putin on his ukraine visit also discusses measures to strengthen ties
युक्रेन भेटीवरून मोदी-पुतिन चर्चा; संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा
How did Indian mango reach China and Pakistan?; India and China face off over mangoes
India-China mango history:आंबा भारताचा, श्रेय घेतंय पाकिस्तान आणि उत्पादनात अग्रेसर चीन; भारतीय आंबा व्हाया पाकिस्तान चीनमध्ये पोहोचलाच कसा?

२०२० मध्ये पाकिस्तानमध्ये जवळपास २० हत्या झाल्या होत्या. या हत्यांमध्ये भारत सामील असल्याचा आरोप केला जाता होता. परंतु, भारताने पाकिस्तानमध्ये हत्या घडवून आणल्याच्या दाव्याचे ठामपणे खंडन भारताने केले आहे. तसंच, द्वेषपूर्ण भारतविरोधी प्रचार करण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भारत सरकारच्या रिसर्च अँण्ड अॅनालिसिस विंगने दिली आहे.

खलिस्तान चळवळीतील शीख फुटीरतावाद्यांना लक्ष्य करणे यासह परकीय भूमीवरील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी या हत्या करण्यात आल्या होत्या, असं युकेतील गार्डियन या वृत्तपत्राने वृत्त दिलं होतं.

२०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर या हत्या घडून आल्यामुळे भारतावर हा आरोप करण्यात येत होता. परंतु, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हे दावे स्पष्टपणे नाकारले आहेत. परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी हे दावे फेटाळून लावून या हत्यांचा भारत सरकारच्या धोरणांशी संबंध सल्याचं म्हटलं आहे.