पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन आता जवळपास १२ दिवस लोटले आहेत. मात्र, राज्यपाल जगदीप धनखार आणि पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेत आलेलं ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार यांच्यातला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. राज्यपाल जगदीप धनखार यांनी गुरुवारी पश्चिम बंगालमधील निवडणुकांदरम्यान हिंसाचार झालेल्या कूचबेहेर भागाला भेट दिली. त्यानंतर आज राज्यपालांनी पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेली परिस्थिती सांगताना राज्य सरकारवर निशाणा साधला. “राज्यातले नागरिक पोलिसांकडे जायला घाबरत आहेत. पोलीस तृणमूलच्या कार्यकर्त्यांना घाबरत आहेत. मी पोलिसांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. मी त्यांना सांगितलं आहे की त्यांच्यासाठी मी छातीवर गोळी खाईन”, असं जगदीप धनखार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा