एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) स्किल सेन्सस म्हणजेच लोकांच्या कौशल्याची तपासणीचे सर्वेक्षण करण्याची कल्पना मांडली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशभरात अशाच प्रकारचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. या माध्यमातून देशातील प्रचंड मनुष्यबळाच्या कौशल्याचा अंदाज येईल आणि त्यातून त्यांच्या विकासाला चालना देता येईल, असे नायडू यांनी सूचविले आहे. एकाबाजूला विरोधकांची इंडिया आघाडी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा रेटून धरत असताना मुख्यंमत्री नायडू हे पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुविधा पुरविण्याबाबत आग्रही आहेत.

एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर टीडीपी पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत केंद्र सरकारबरोबर बैठकांचे सत्र घेतले. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या धोरणामुळे राज्यावर आर्थिक ताण आलेला आहे. राज्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढणे आणि राज्याचा विकास करणे, हाच आमचा प्राथमिक उद्देश असल्याचे नायडू यांनी सांगितले आहे. अमरावतीला आंध्रप्रदेशची नवी राजधानी बनवणे, रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणे यासह विविध विभागांची पाच श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय नायडू यांनी घेतला आहे.

possibility of a rift in the Mahavikas Aghadi over the Gondia Assembly Constituency
पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद अन् दोघेही बाशिंग बांधून तयार, पण सुमंगल कोणाचे? गोंदियावरून आघाडीत तिढा!
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
PM narendra modi Chandrababu Naidu and Nitish kumar
तिरुपती लाडू भेसळ वाद आणि नितीश कुमारांकडून राम मंदिराचे कौतुक; भाजपाच्या मित्रपक्षांनीही रेटला हिंदुत्वाचा मुद्दा
prashant kishor on bihar liquor ban
“बिहारमध्ये सत्ता आल्यास, तासाभरात दारुबंदी उठवू”; जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांची घोषणा
jammu and kashmir polls 2024 bjp likely to get major seats in jammu
Jammu And Kashmir Assembly Polls: …तरीही जम्मूमध्ये मते भाजपलाच!
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित
tough challenge for local parties BJP, Congress in Haryana
विश्लेषण : हरियाणात पंचरंगी लढतींमध्ये स्थानिक पक्ष निर्णायक… भाजप, काँग्रेससमोर खडतर आव्हान?

अक्षता मूर्ती ४२ हजारांचा ड्रेस परिधान केल्याने ट्रोल, नेटकरी म्हणाले, “ऋषी सुनक निरोपाचं भाषण देताना…”

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, नायडू म्हणाले की, राज्याचा विकास कसा असावा हे आम्ही जनतेवर सोपवले आहे. माझा अनुभव वापरून मी आंध्रप्रदेशला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेऊ इच्छितो. देश आणि परदेशातील गुंतवणूक आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्रीय मंत्र्यांखेरीज नायडू यांनी काही उद्योगपतींचीही भेट घेतली आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती आता बदलली असून राज्यात उद्योग थाटले जावेत, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

Video: ८३ कोटींचं मानधन घेणाऱ्या जस्टिन बीबरच्या गाण्यांवर थिरकले अंबानींचे पाहुणे, पाहा जगप्रसिद्ध पॉपस्टारचा परफॉर्मन्स

मुख्यमंत्री नायडू म्हणाले, “उद्योगपती राज्यातील चुकीच्या प्रथांना घाबरत होते. मात्र विकासाच्या आड येणाऱ्यांना आम्ही बाजूला सारले असून आता राज्यावर आमचे नियंत्रण आहे.” भाजपाकडे टीडीपीने सत्तावाटपात वाटाघाटी केल्याच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. आम्ही भाजपाकडे कोणतीही मागणी केली नाही. वाजपेयींच्या काळातही आम्ही काहीच मागितले नव्हते. आम्हाला केंद्राकडून जे काही देण्यात आले आहे, ते आम्ही स्वीकारले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.