‘युनिफॉर्म सिव्हिल कोड’ अर्थात समान नागरी कायद्याची सध्या देशात जोरदार चर्चा चालू आहे. भारतीय संविधान लागू झाल्यानंतर देशात लवकरात लवकर समान नागरी कायदा लागू करावा, अशी भूमिका स्वत: संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची होती. गेल्या ७०-७५ वर्षांच्या काळात विविध सरकारांनी समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पूर्णत्वास गेला नाही. विविधतेतून एकता हे आपले ब्रीद. त्यामुळे या कायद्यामुळे धार्मिक विविधतेवर घाला येईल की काय, असं काही लोकांना वाटतं. पण आता केंद्रातील भाजपा सरकार देशात समान नागरी कायदा आणू पाहत आहे. भाजपाची नेहमी या कायद्याच्या समर्थनार्थ भूमिका राहिलेली आहे. काही महिन्यांपूर्वी समान नागरी संहितेची पडताळणी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी विधि आयोगाने सर्व सामाजिक आणि धार्मिक संघटनांकडून सूचनाही मागवल्या होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा