गेल्या काही महिन्यांपासून वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरू आहे. काशी विश्वनाथ मंदिर पाडून तिथे ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली, असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे. अलीकडेच वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयाने मशिदीत वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात मशिदीत सर्वेक्षणाला सुरुवातही झाली. दरम्यान, ज्ञानवापी प्रकरणावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मशिदीत त्रिशूळ काय करतंय? असा प्रश्न आदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले, त्या इमारतीला मशीद म्हणाल तर मग वाद होईल. ईश्वराने ज्याला दृष्टी दिलीय त्यांनी पाहावं आणि सांगावं मशिदीत त्रिशूळ काय करतंय? आम्ही तर ठेवलेलं नाही. तिथे ज्योतिर्लिंग आहे, देवाच्या प्रतिमा आहेत. तिथल्या भिंती ओरडून ओरडून काय सांगतायत? मला वाटतं मुस्लिमांच्या बाजूने प्रस्ताव यायला हवा, त्यांनी म्हटलं पाहिजे की, एक ऐतिहासिक चूक झाली आहे आणि आम्हाला त्या चुकीवर उपाय हवा आहे.

Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
cm eknath shinde inaugurates bow string’ arch bridge connecting coastal road sea link
सागरी सेतूमुळे परदेशात आल्याचा भास; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
Shinde group, NCP Ajit Pawar party,
लाडकी बहीण योजनेतून राष्ट्रवादीने ‘ मुख्यमंत्री ’ शब्द वगळल्याबद्दल शिंदे गटाचा आक्षेप, मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद
Shinde group displeasure with NCP over Ladaki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेतील ‘मुख्यमंत्री’ शब्द गायब; राष्ट्रवादी काँग्रेसवर शिंदे गटाची नाराजी
Himanta Biswa Sarma
CM Himanta Sarma : “आसामला धमकवण्याची तुमची हिंमत कशी झाली?” ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ विधानवरून मुख्यमंत्री सरमा यांचा हल्लाबोल!
devendra fadnavis shivaji maharaj statue collapse
“पुतळ्याच्या घटनेचे राजकारण नको”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
champai soren will join bjp
ठरलं! चंपई सोरेन ‘या’ तारखेला भाजपात प्रवेश करणार; आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; म्हणाले…

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते. या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी ज्ञानवापीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा >> Chandrayaan 3 मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा आज मध्यरात्रीपासून, नेमकं काय होणार? वाचा

याचप्रकरणी अजून एका प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आपला देश संविधानावर चालतो, कुठलंही मत किंवा धर्माच्या आधारावर चालत नाही. एक लक्षात घ्या, मी ईश्वराचा भक्त आहे, पण कुठल्याही ढोंगीपणावर विश्वास ठेवत नाही आणि इतरांनीही ठेवू नये. तुमचं मत, तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत मर्यादित असू द्या. धर्म हा मशिदीपर्यंत अथवा प्रार्थनास्थळापर्यंत असेल. या गोष्टी रस्त्यावर आणू नका. तुमच्या या गोष्टी तुम्ही इतरांवर लादू शकत नाही. या देशात कोणाला राहायचं असेल तर त्याच्यासाठी राष्ट्र प्रथम असलं पाहिजे. तुमचं मत किंवा तुमचा धर्म यापेक्षा राष्ट्र सर्वात पुढे असायला हवं.