क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार Nirbhaya Case प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा , पवन गुप्ता या चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवत ऐतिहासिक निकाल दिला. मात्र, दोषींच्या वकिलांनी या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. समाजाला संदेश देण्यासाठी कोणाला फाशी दिली जाऊ शकत नाही. यामुळे मानवी हक्कांच्या चिंधड्या उडाल्या आहेत, असे आरोपींचे वकील एपी सिंग यांनी म्हटले. ‘हम यहॉ तारोकी उम्मीद लेकर आये थे, पर हमे अंधेरा मिला’, अशी टिप्पणी सिंग यांनी केली. या प्रकरणात बिलकूल न्याय झालेला नाही. शिक्षा ही सुधारणा होण्यासाठी असते. गांधींजींना अपेक्षित असलेल्या अहिंसेच्या तत्त्वाला यामुळे हरताळ फासला गेला आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयाच्या निकालाची संपूर्ण प्रत वाचून फेरविचार याचिका दाखल करू, असे एपी सिंग यांनी म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा