रेल्वे सेवा हे भारतातील सर्वांत महत्त्वाचे वाहतुकीचे साधन आहे. आपल्या देशात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतात रेल्वेचा प्रवास हा सर्वांत सोपा आणि सोईस्कर प्रवास मानला जातो. भारतीय रेल्वेचे जाळे दूरवर पसरलेले आहे. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे व आशियातील दुसरे सर्वांत मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोईसाठी वेळोवेळी सुविधा उपलब्ध करून देत असते.

भारतीय रेल्वेकडून एकाच ट्रेनमध्ये वेगवेगळ्या श्रेणींनुसार आसनव्यवस्था असलेल्या डब्यांची व्यवस्था केली जाते. त्यामुळे नागरिकांना आपापल्या ऐपतीनुसार प्रवास पूर्ण करणे शक्य होते. मेल वा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये वातानुकूलित, शयनयान व सर्वसामान्य अशा तीन प्रकारची आसनव्यवस्था असलेले डबे असतात. त्यामधील सर्वसामान्य आसनव्यवस्थेच्या डब्याला अनारक्षित श्रेणी, असेही म्हटले जाते. त्याचे तिकीट शुल्क सर्वांत कमी म्हणजे स्वस्त असते; परंतु त्या डब्यामधील कोणतेही आसन आरक्षित नसते.

Increase in entertainment fees business license fees Mumbai print news
करमणूक शुल्क, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ; व्यावसायिक झोपड्यांना कर
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”

भारतीय गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट काढणे आवश्यक आहे. प्रवासापूर्वी प्रवासी रेल्वेचे तिकीट बुक करतात; परंतु भारतात कित्येक प्रवासी विनातिकीटही ट्रेनमध्ये चढतात. तथापि, अशा विनातिकीट प्रवाशांना तिकीट तपासनीस (TTs) गाडीतून उतरवू शकतात. बहुतेक लोकांना याबाबतचा नियम माहीत असेल. परंतु, तुम्हाला रेल्वेचा हा नियम माहीत आहे का की, ज्यामध्ये तिकीट असूनही टीटी तुम्हाला ट्रेनमधून उतरवू शकतो. मात्र, हा नियम केवळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करण्यात आला आहे.

(हे ही वाचा : वेगाने रेल्वे धावत असताना अचानक ब्रेक दाबल्यास गाडी रुळावरुन खाली घसरते? जाणून घ्या सत्य…)

रेल्वे मंत्रालयाच्या माहिती आणि प्रसिद्धी संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण प्रवासादरम्यान प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हा नियम करण्यात आला आहे. प्रवासापूर्वी किंवा प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाची तब्येत बिघडल्यास हा नियम लागू होतो. प्रवाशाची तब्येत बिघडत आहे, असे टीटीला वाटत असेल, तर तो प्रवाशाला प्रवासाच्या मध्यभागी उतरण्याचा सल्ला देतो. अशा परिस्थितीत प्रवाशाने त्या सल्ल्याचे पालन न केल्यास, तिकीट असूनही TT त्याला प्रवासाच्या मध्यभागी ट्रेनमधून उतरवू शकतो.

रेल्वेच्या या नियमामागील कारण अगदी स्पष्ट आहे. प्रवासादरम्यान एखाद्या ठिकाणी वैद्यकीय मदत उपलब्ध होण्याचे प्रमाण खूप कमी असू शकते. ट्रेनमध्ये एखाद्याचे आरोग्य बिघडल्याने उद्भवू शकणारी आपत्कालीन परिस्थिती टाळणे हा या नियमामागील उद्देश आहे. अशा परिस्थितीत या नियमाद्वारे रेल्वे प्रशासन प्रवाशांची सुरक्षितता वाढवू इच्छित आहे; तसेच कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करू इच्छिते.

या नियमानुसार, जेव्हा प्रवाशाला आरोग्याच्या समस्येमुळे ट्रेनमधून उतरण्यास सांगितले जाते. तेव्हा त्यानंतर त्याला प्रवास करण्यासाठी फिटनेस चाचणी प्रमाणपत्र द्यावे लागते. प्रवासी तसे करण्यात अयशस्वी झाल्यास, त्याला किंवा तिला गाडीत चढण्यापासून किंवा प्रवास सुरू ठेवण्यापासून रोखले जाऊ शकते. या नियमाद्वारे रेल्वे आपल्या प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास प्रदान करू इच्छिते. हे नियम कोणत्याही प्रवाशांनी पाळले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

या मार्गदर्शक तत्त्वाद्वारे, रेल्वे प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी त्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता तपासण्यास सांगितले जाते. परिणामी प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही.

Story img Loader