परदेशात जाण्यासाठी आपल्याकडे व्हिसा आणि पासपोर्ट असणे बंधनकारक असते. भारतातून इतर कोणत्याही देशात प्रवास करत असाल तरी मग ते विमान असो, ट्रेन असो वा जहाज, तुमच्याकडे व्हिसा पासपोर्ट असणे गरजेचेच आहे. पण तुम्हाला माहित आहे का, भारतात एक असे रेल्वे स्टेशन आहे, जिथून ट्रेन पकडण्यासाठी तुमच्याकडे व्हिसा पासपोर्ट असणे गरजेचे आहे. आता तुम्ही विचार करत असा की, भारतीय रेल्वेने प्रवास करताना व्हिसा आणि पासपोर्टची गरज का लागते. पण यामागे खूप मोठं कारण आहे. नेमकं हे कारण काय आणि हे रेल्वे स्टेशन कुठे आहे जाणून घेऊ…

US Deportation
Illegal Immigration : नावही माहिती नसलेल्या एजंटला दिले ४५ लाख रुपये; सहा महिन्यांचा प्रवास नी मेक्सिको बॉर्डरवरून परत भारतात
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Image Of S Jaishankar
S Jaishankar On Deportation : “परदेशात अवैधपणे…”, अमेरिकेने १०४ भारतीय स्थलांतरितांना माघारी पाठवल्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांचे राज्यसभेत मोठे विधान
Nagpur imprisoners loksatta news
कैद्यांना कुटुंबियांची घेता येईल ‘ई-भेट’, वेळेची होणार बचत, त्रासही होईल कमी
US deports Indian migrants in military plane
बेकायदा स्थलांतरित भारतीयांची पाठवणी; मोदी-ट्रम्प भेटीची वाट न पाहता अमेरिकेची कारवाई
indian railways viral video argument between tte and passenger
टीटीईने व्हिडीओ काढणाऱ्या प्रवाशाला सांगितला भलताच कायदा; “सात वर्षांचा तुरुंगवास अन्….”, पाहा संतापजनक VIDEO
Anti-conversion law soon in Maharashtra and Bangladeshis Rohingyas will be sent back says Nitesh Rane
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा, बांगलादेशी, रोहिंग्याना परत पाठवू – नितेश राणे
IMA training company names change news in marathi
इंडियन मिलिटरी ॲकॅडमीमधीलल ब्रिटिश प्रभाव पुसणार? नेमके प्रकरण काय आहे ?

हे रेल्वे स्टेशन पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आहे. या अटारी स्टेशनवरुन पाकिस्तानला ट्रेन धावतात, त्यामुळे देशातील हे एकमेव स्टेशन आहे जिथे व्हिसा लागू आहे. जर व्हिसाशिवाय तुम्ही येथे पोहोचलात तर स्टेशनवर पकडल्यानंतर तुम्हाला तुरुंगात पाठवले जाऊ शकते. हा मुद्दा भारत-पाकिस्तान संबंधित असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव येथे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था आहे. अनेक चित्रपटांचे चित्रिकरणही याठिकाणी झाले आहे.

दिल्ली किंवा अमृतसरहून पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जाणाऱ्या गाड्या अटारी स्टेशनवरून जातात. दोन्ही देशांमधील नागरिकांसाठी भारत आणि पाकिस्तानदरम्यान या रेल्वे धावतात. यामध्ये समझौता एक्स्प्रेसचाही समावेश आहे. पण गेल्या काही वर्षात पाकिस्तानशी बिघडलेल्या संबंधांमुळे ही रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती.

अटारी स्टेशनवर जबरदस्त सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते. गुप्तचर यंत्रणेचे अधिकारीही प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. यामुळे या स्थानकावर पोर्टरला राहण्याची परवानगी नाही, सामान कितीही जड असले तरी ते तुम्हाला एकट्याला उचलून न्यावे लागते.

अटारी स्टेशनवर व्हिसा आणि पासपोर्टशिवाय पकडल्यास व्यक्तीला १४ फॉरेन ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो, म्हणजेच व्हिसाशिवाय आंतरराष्ट्रीय हद्दीत पकडला जातो. आश्चर्याची बाब म्हणजे, अशा प्रकरणांमध्ये आरोपींना जामीन मिळण्यासाठी अनेक वर्षे लागतात.

Story img Loader